पुणे–एकीकडे आपण केवळ पर्वती विधानसभेतून निवडून जाण्यास उत्सुक असल्याचे सांगणारे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची दिल्लीत जावून भेट घेतल्याने हि भेट केवळ विधानपरिषदेच्या निवडणुकीत बागुल यांच्या उमेदवारीची होणारी चर्चा या अनुषंगानेच घेतली गेल्याचा राजकीय समीक्षकांचा दावा आहे .गेली ३० वर्षे नगरसेवक म्हणून आणि पक्षाचे निष्ठावंत म्हणून ओळख असणाऱ्या आबा बागुलांना विधानपरिषदेच्या माध्यमातून आमदारकी देवून विधानसभेला पर्वती राष्ट्रवादीच्या हाती नेहमीप्रमाणे दिला जाईल असा अंदाज बांधला जातो आहे .जर राष्ट्रवादीला पर्वती सोडवा लागणार असेल तर पुन्हा आबा बागुल सारख्या जुन्या ज्येष्ठ नेत्याला डावलण्याची नामुष्की पक्षावर येवू शकते .या अनुषंगाने आबा यांची आताच शरद रणपिसे यांच्या जागेवर नियुक्ती व्हावी असा सूर आहे. रणपिसे यांना पक्षाने बरीच संधी दिली आहे आता त्यांना पक्षबांधणीसाठी वेगळी जबाबदारी त्यांच्यावर सोपवावी असाही सूर आहे .
दरम्यान आपण हि भेट केवळ आक्रमक, अभ्यासू आणि समाजाच्या विविध प्रश्नांची जाण, कॉमनमॅनविषयी आस्था असणारे काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी घेतली असे स्पष्टीकरण आबा बागुल यांनी केले आहे.