.पुणे / प्रतिनिधी :
रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निर्बंधामुळे दीड वर्षापासून अडचणीत आलेल्या रुपी बँकेचे पुनरुज्जीवन करा, अशी मागणी रुपी बँकेच्या खातेदार, ठेवीदारांकडून करण्यात आली.
रिझर्व्ह बँकेकडून घेतल्या जाणार्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठी पुणेकर नागरिक कृती समिती व रुपी बँक बचाव समितीच्या वतीने खातेदार व ठेवीदारांच्या वतीने अलका टॉकीज चैाकामध्ये साखळी आंदोलन केले. यावेळी संघर्ष समितीचे नरेश राऊत, गणेश देशपांडे, किशोर बावीस्कर, सुधा धुपकर आदींसह ठेवीदार व खातेदार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांपासून रिझर्व्ह बँकेवर आर्थिक निर्बंध घातले असून, त्यामुळे हजारो ठेवीदार व खातेदार अडचणीत आले आहेत. बँकेतील संचालकांच्या गैरव्यवहारामुळे रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेवर आर्थिक निर्बंध टाकले आहेत. त्यानंतर तातडीने बँकेचे अन्य बँकेत विलीनीकरणासाठी प्रय▪करण्यात आले, परंतु त्यावर निर्णय झाला नाही. सध्या पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरणासंदर्भात प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यावरही अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही