जीएसटी हा एक क्रांतिकारक निर्णय आहे. भारताला महासत्ता व्हायचे असेल तर हा कायदा प्रामाणिकपणे आमलात आणला पाहिजे. परंतु यामध्ये सुसुत्रता हवी आणि कर 18 ते 20 टक्क्यांपेक्षा जास्त नको. जीएसटीमुळे काहींच्या किंमती वाढतील तर काहींच्या कमी होणार आहेत. आता मात्र उद्योगपती, व्यापारी यांच कर्तव्य आहे की जीएसटी चा फायदा ग्राहकांपर्यंत कसा पोहोचवला येईल. याचा फायदा जर ग्राहकांपर्यंत नाही पोहोचवला तर जीएसटी सारख्या सुंदर कायद्याचं काही निष्पन्न होणार नाही. या कायद्यामुळे मात्र बांधकाम क्षेत्रातील किंमती मात्र वाढणार असून बांधकाम व्यावसायिकांना 18 ते 20 टक्के जरी कर पडला तरी त्यांना तेवढी सवलत मिळणार नाही.
डी एस कुलकर्णी (अध्यक्ष डीएसके समूह )
अध्यक्ष, डीएसके समुह