यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आमिर आणि अमिताभ बच्चन एकत्र आले. अर्थातच जेव्हा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आणि बॉलिवूडचा महानायक एकत्र येतात, तेव्हा प्रेक्षकांना चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा होत्या.. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चा पोस्टर, टीझर, ट्रेलर आणि गाणी पाहता चित्रपटांमध्ये खूप उत्सुकता होती. व्हीएफएक्स, मोठमोठ्या कलाकारांची वर्णी, तगडी स्टारकास्ट, भरपूर खर्च असं एवढं सगळं पॅकेज असताना चित्रपट प्रेक्षकांना वैसा वसूल मनोरंजन देईल अशी अपेक्षा होती. पण चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली आहे. .केवळ अमिताभ बच्चन च्या प्रेमापोटीच प्रेक्षक हा सिनेमा पावणेतीन तास बसून पाहत असावेत असे वाटल्याशिवाय राहत नाही .निव्वळ अमिताभ बच्चन हेच या चित्रपटाचे आकर्षण ठरले आहे , यातील अमीर खान हि प्रेक्षकांना भावेल असे वाटत नाही .एकूणच ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ने प्रेक्षकांनाच ठगवले आहे.मोठा खर्च ताकझाक असूनही कथा सातत्याने भरकटत राहिल्याने नको तेवढा सिनेमा विनाकारण लांबविल्याने प्रेक्षक बोअर झाले .एकतरप्रेक्षक हल्ली सिनेमागृहात येत नाही आणि उत्सुकतेने आला आणि असे सिनेमे नशिबी आले तर यापेक्षा मोबाईलवर रमलेलो बरे असे म्हटल्यास नवल वाटणार नाही .