संगीत हे एक असं माध्यम आहे ज्याने आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो, एकप्रकारचं औषध आहे हे आपल्या प्रत्येक भावना जणू समजून घेण्याचं काम संगीत ही कला करत असते. मुळात हे असं माध्यम आहे जे वैचारिक आणि सामाजिक पातळीपर्यंत पोहचू शकत. अशाच एका सैनिक पत्नीची भावना “सजन घर आओ रे” या हिंदी गाण्याच्या माध्यमातून व्यक्त होणार आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गायिका अन्वेशा दत्ता या गायिकेने हे गाणं गायलं आहे. अन्वेशाने “गोलमाल रिटनर्स”, “डेंजरस इश्क”, “रांझणा”, “प्रेम रतन धन पायो” यांसारख्या अनेक बॉलिवुड सिनेमांसाठी गाणे गायले आहे.
“सजन घर आओ रे” हे गाणं अत्यंत कमी वेळ मिळणाऱ्या सहजीवना करता आतुरतेने पतीची वाट बघणाऱ्या पत्नीचे मनोगत व्यक्त करतांनाच, पती युध्धभूमीवर लढतांना त्याच्या जिवाच्या काळजीने होणारी पत्नीच्या मनाची घालमेल हि देखील ह्या गाण्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एस.व्ही.पी एन्टरप्राइजेस या निर्मितीसंस्थेने या गाण्याची निर्मिती केले असून प्रसाद फाटक यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. या अगोदर प्रसाद यांनी “सांजवेळी सोबतीला”, द्रौपदी से दामिनी”, “तुझ्याविना” यांसारखे अनेक म्युझिक सिंगल्सची निर्मिती केली. जनजागृतीपर संदेश देणाऱ्या गाण्यांचे दिग्दर्शन करणाऱ्या प्रसाद यांनी काही व्यवसायिक गाण्यांचे दिग्दर्शनही केले. सैनिकांच्या पत्नीला आपला पती अनेक दिवसांनी घरी येण्याचा तिचा आनंद, तसेच तो घरी येणाच्या एक दिवस अगोदर मिळालेल्या युद्धाच्या बातमीने होणारी तिची तगमग समीर सामंत यांच्या शब्दांनी व्यक्त होते आहे. समीर सामंत यांनी “कट्यार काळजात घुसली”, उंबटू” अशा अनेक सिनेमांसाठी गाणी लिहिली आहेत. व्हेलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेले हे गाणे सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या सैनिक पत्नींना समर्पित आहे.