लव्ह लग्न लोचा …ज्या मालिकेच्या नावातच लोचा आहे , तिथे लोचे होणे हि काही नवीन गोष्ट नाही . मैत्रीचं प्रेम , लग्नातील मज्जा आणि या सगळ्यांतून होणारे लोचे हे आज प्रत्येकाच्या आयुष्यातील एक भाग आहे . झी युवावच्या या फ्रेश मालिकेला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत . या मालिकेने बच्चे पार्टीपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला आपलेसे केलं आहे . मैत्रीचे वेगेवेगळे रंग दाखवणारी ही मालिका सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आणि गावात आवडीने पहिली जात आहे .यातील राघव , सौम्या , अभिमान , सुमीत , विनय , काव्या , आकांशा आणि खळखळून हसणारी शाल्मली ही मित्रमंडळी आज सगळ्यांची आपली झाली आहेत . आज मैत्रीच्या मालिकांमध्ये लव्ह लग्न लोचा उच्चांग गाठत आहे . पण या मालिकेमध्ये एक मोठा लोचा होणार आहे . याच टीम ला आता बेघर व्हावे लागणार आहे . म्हणजे विनय राघव आणि सुमीत ला . त्याच काय झालंय विनय राघव आणि सुमीत हे गेली अनेक वर्षे माने कुटुंबियांच्या फ्लॅट मध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहतात हे आपल्याला माहीतच आहे . माने कुटुंब सुद्धा त्यांना अगदी मुलासारखे सांभाळतात प्रेम करतात . पण हेच माने कुटुंबियांच्या खऱ्या मुलाला खुपसले . एक तर तो अनेक वर्षे अमेरिकेत होता . स्वभावानेच अहंकारी , तिरकस असलेला श्रीकांत म्हणजेच आपला समीर खांडेकर . आता श्रीकांत तिरस्काराने पेटला आहे . त्यामुळे माने काकूंना तो पटवून देणार आहे कि हि आपली विनय , सुमीत आणि राघव ची गॅंग कशी चुकीची आहे आणि त्यांना तो घराबाहेर काढणार आहे . पण त्यानंतर काय ? श्रीकांत खरंच असे करू शकेल ? आपले विनय , सुमीत राघव कुठे जाणार ? गुड च्या विरुद्ध बॅड एकमेकांच्या समोर काय टिकणार ? या लोच्याच नक्की काय होते हे पाहण्यासाठी पहात राहा “लव्ह लग्न लोचा “झी युवावर सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता .