पुणे-उन्हाने आणि उकाड्याने आज शनिवारी हि लाही लाही होत असल्याने पुणेकरांनी दुपारी घराबाहेर पडणे शक्यतो वर्ज्य केल्याचे दिसून आले.पुण्यात आज कामाल तापमान 42.6 एवढे नोंदवले गेले .दुपारनंतर आकाश ढगाळ आणि हवा कोरडी असे चित्र होते .या पुढील दिवसात म्हणजे उद्यापासून 3 मे पर्यंत साधारणतः प्रती दिवस 1 या प्रमाणे तापमान कमी होत जाईल . ३मे रोजी अंदाजे ३८ कमाल तापमान असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.२९ एप्रिलला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता राहील . ३० व 1 मे ला कोकण आणि गोव्यात तुरळक पावसाची शक्यता राहीलअसेही हवामान खात्याने म्हटले आहे.
हवामान खात्याने दिलेला इशारा –
२७-२८एप्रिल – विदर्भात बऱ्याच ठिकाणी,मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. उत्तर मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात काही ठिकाणी रात्री तापमान जास्त्त राहील.
२९एप्रिल : विदर्भात बऱ्याच ठिकाणी ,मराठवाड्यात काही ठिकाणी तरमध्य महाराष्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता.
३०एप्रिल -१ मे: विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता.
आज नोंदविले गेलेले महाराष्ट्रातील तापमान –
मुंबई(कुलाबा) ३४.०, सांताक्रूझ३४.१, अलिबाग ३१.८,रत्नागिरी ३३.२, पणजी (गोवा) ३३.७,डहानु३५.६,पुणे ४२.६, अहमदनगर ४४.९,जळगाव ४४.४, कोल्हापूर ४१.०, महाबळेश्वर ३६.१, मालेगाव ४३.२, नाशिक४१.७, सांगली ४३.०, सातारा ४१.६, सोलापूर४४.३,उस्मानाबाद ४३.८,औरंगाबाद४३.०,परभणी ४५.७, नांदेड ४४.५, बीड ४४.२, अकोला ४६.४,अमरावती ४५.४,बुलढाणा४३.१, ब्रम्हपुरी४५.८, िंद्रपूर४५.६,गोंदीया ४३.८,नागपूर४५.२,वाशिम ४४.२, वर्धा ४५.७,यवतमाळ ४४.५.
बारामती शहरात आज गेल्या अनेक वर्षातील उच्चांकी म्हणजे तब्बल 43 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसात उन्हाचे बारामतीकरांची लाही लाही होत होती, आज मात्र उन्हाने कहर केला.दुपारी बाहेर पडलेल्या बारामतीकरांना या उन्हाने अक्षरशः भाजून काढले. आज अनेकांच्या स्मार्ट फोनवर बारामतीचे तापमान तब्बल 43 अंश सेल्सियस दाखवत होते. या उन्हाच्या तीव्रतेने बाजारपेठेवरही परिणाम जाणवत असून उन उतरल्याशिवाय लोक घराबाहेर पडत नसल्याचे दिसत आहे.