- वडगाव शेरी ः राष्ट्रवादीच्या काळात रखडलेल्या भामा आसखेड पाणी पुरवठा योजनाचा प्रकल्पाच योजनाचे काम रखडलेले होते. मात्र, आता ते काम अंतिम टप्प्यात आल आहे. पुढील तीन महिन्यात भामा- आसखेडच पाणी वडगावशेरी, चंदननगर, धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर,लोहगाव आणि वाघोली या भागातील नागरीकांना मिळणार असल्याची माहिती आमदार जगदिश मुळीक यांनी दिली.
वडगावशेरी विधानसभा मतदार संघामध्ये भाजप आरपीआय, रासप महायुतीचे उमेदावर आमदार जगदिश मुळीक यांची आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्प हार अर्पण करून चंदननगर, संघर्ष चोक, चव्हाणनगर, बोराटे वस्ती, बिडी कामगार, यशवंत नगर या भागामध्ये प्रचार फेरी काढली. यावेळी आमदार मुळीक बोलत होते. या प्रंसगी नगरसेविका सुनीताताई गलांडे,नगरसेवक संदीप जऱ्हाड,नगरसेविका शीतल शिंदे,आशा जगताप,विशाल साळी,राजाभाऊ चौधरी,सचिन सातपुते,संतोष भरणे,स्वप्नील चव्हाण,अनिल जावळकर,नवनाथ पठारे,राजेंद्र पठारे,विनोद कर्ताळ, सोमनाथ पठारे,शैलेश बनसोडे,शांताराम कावरे,,बाळा पऱ्हाड, आणि साधुतात्या थोरात तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार मुळीक म्हणाले की, पुर्व पुणे भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेतून २.६ टीएमसी पाणी महापालिकेसाठी मंजूर केले आहे. पण, राष्ट्रवादीच्या सरकारला ही योजना पुर्ण करता आली नाही. भाजप सरकारने या कामाला गती दिली. या योजनासाठी फ्रेबुवारीमध्ये 185 कोटीची तरतुद करण्यात आली आहे. तसेच भामा -आसाखेड योजने अतंर्गत पाण्याच्या टाकी बांधणे, जॅकवेल आणि पाईपलाईनचे काम जवळपास 90 टक्के पुर्ण झाले आहे. यामुळे पुढील तीन महिन्यात नागरीकांना भामा-आसखेडच पाणी मिळणार आहे.या योजनेमुळे पुर्व पुणेचा परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. गेल्या पाच वर्षामध्ये पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अनेक काम केली आहेत.