मुंबई- देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली .
पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
- ‘गेल्या ५ वर्षांत आम्ही कुठेही महाराष्ट्राच्या विकास कामांच्या आड राजकारण येऊ दिलं नाही.’
- पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबावर खोटारडेपणाचा आरोप
- आम्ही जर भाजपसोबत नसतो तर ते विकास करू शकले नसते
- आज शिवसेना प्रमुखांच्या मुलावरती खोटे आरोप झाले
- अमित शहांचा संदर्भ देऊन आमच्यावर खोटेपणाचा आरोप केला गेला, पण जनतेला सर्व माहिती आहे कोण खोटं बोलतय
- शब्द देऊन फिरवण्याची भाजपची वृत्ती
- अमित शहा, देवेंद्र फडणवीस आले होते तेव्हा युतीची चर्चा थांबली त्याच कारण मी होतो
- शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ,असे ते म्हणाले होते. परंतु मला ते मान्य नव्हतं त्यामुळे चर्चा थांबवली आणि मी तेथून निघून आलो.
- मी खोटा नसून भाजप खोटे आहे
- मुख्यमंत्रीपदाबाबत तेव्हाच ठरलं होत. तेव्हा फडणवीस म्हणाले हे आता जाहीर झालं तर मला पक्षांतर्गत प्रॉब्लेम होईल
- लोकसभेत आमच्या गळ्यात अवजड मंत्रिपद बांधलं
- मी भाजपला शत्रुपक्ष मानत नाही ते गेल्या पाच वर्षात सतत खोटं बोलत आहेत
- मी तुमची अडचण समजून घेतली हा माझा गुन्हा का?
- मी भाजपला शत्रु मानत नाही, पण भाजपने खोटं बोलू नये
- साताऱ्याची जागा शिवसेनेला दिलेली ती उदयनराजेंसाठी सोडली ते विसरलेत का