आमदाराने केली चोरी :महापालिकेच्या कार्यालयातून पळविली आयुष्यमान भारत योजनेची कार्डे (व्हिडीओ)
पुणे- मतांच्या साठी आपण जनतेकडे जाऊन लाचारी करण्याऐवजी ,जनतेला आपल्याकडे हेलपाटे मारायला लावायचे ..या कुटील हेतूने एका आमदारानेच पुणे महापालिकेच्या क्षत्रिय कार्यालयातील केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत या योजनेची हजारो लोकांची कार्डे चोरून पळवून नेल्याची तक्रार आज राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी केली .
ते म्हणाले याबाबत आम्ही पोलिसात तक्रार दिली आहे . केंद्र सरकारने गोरगरिबांच्या मदती साठी ,आरोग्याच्या देखभाली साठी आयुष्यमान भारत या योजनेची कार्डे पालिकेच्या क्षत्रिय कार्यालयातून वाटप होणार होती . पण ती निवडणुकीपूर्वीच २ महिने अगोदर आमदाराने कार्यालयातून चोरून ,पळवून नेली .
याबाबत ची हकीकत अशी कि या आमदाराने , लोकांनी आपल्याकडे येवून हि कार्डे घेऊन जावीत या हेतूने हि कार्डे नियम बाह्य पद्धतीने पळविल्याचे समजते ज्यास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील साथ दिली असावी असा तर्क केला जातोय .मात्र तुपे पाटील यांनी हि चोरी आहे असा आरोप करत महापालिकेचे कामकाज पालिकेच्या अधिकाऱ्यांनीच केले पाहिजे गरीब जनतेला अशा पद्धतीने छळण्याचा त्यांना हक्क नाही असा मुद्दा उपस्थित करत या चोर आमदाराचा छडा लावून त्यावर कारवाई करावी आणि सर्व कार्डे त्याच्या ताब्यातून परत घेऊन नियमानुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या कार्डांचे वाटप करावे अशी मागणी केली आहे.सुमारे १५ ते २० हजार कार्डे आमदाराने आणून दिली नाहीत तर आम्ही प्रसंगी त्याचा छडा लावून ती असतील तिथे घुसून ताब्यात घेऊन पालिकेच्या हवाली करू असे ते म्हणाले .या मादाराने केलेल्या या कृत्यामुळे नागरिकांना हि कार्डे ८ महिने उशिरा मिळणार आहेत आणि त्यामुळे नागरिकांना असलेल्या सुविधांना या काळात मुकावे लागले असेही ते म्हणाले .. नेमके तुपे पाटील काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात ..प्रथम एका ज्येष्ठ नागरिकाचे म्हणणे ऐका ..