पुणे-माणसातील ‘माणूस’ निर्माण करण्यासाठी वाचन महत्वाचे आहे. वाचनामुळे समस्यांकडे पाहाण्याची दृष्टी मिळते, उत्साह वाढतो, चांगले काम करण्याची उर्मी मिळते, अवांतर वाचनामुळे बुध्दीची वाढ होते. चांगले साहित्य वाचल्यावर आधीचा माणूस राहात नाही. वाचनामुळे जीवन संपन्न होते, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले.
डेकन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात आयोजित केलेल्या ग‘ंथप्रदर्शनाचे उद्घाटन करताना ‘वाचन संस्कृती आणि आजचा युवक’ या विषयावर डॉ. अवचट बोलत होते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. अवचट म्हणाले, ‘प्रत्येक व्यक्तिमध्ये काही तरी चांगले दडलेले असते. परंतु पैसा आणि उपभोगाच्या दडपणाखाली तो गेलेला असतो. त्याला बाहेर काढण्यासाठी वाचन महत्वाचे आहे.’
मोबाईलच्या वापराने स्वतःचा स्वतः शी आणि इतरांशी संवाद कमी झाला आहे. तो वाढविण्यासाठी वाचन महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन केल्याची माहिती डॉ. रावळ यांनी दिली. उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, डॉ. आशीष पुराणीक, डॉ. सुरेश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. निशा घोरपडे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्र दर्शन केले.
या प्रदर्शनात वि. स. खांडेकर, डॉ. आनंद यादव, शिवाजी सावंत, विश्वास पाटील, सुधा मूर्ती, ओशो, शांता शेळके, एम. एस. भैरप्पा आदी साहित्यिकांची स्वतंत्र दालने आहेत. याशिवाय अभ्यासासाठी अवांतर व पूरक साहित्य मांडण्यात आले आहे. शनिवार ता. १६ सप्टेंबरपर्यंत सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.