भारतीय चिंतनावर आधारिक शिक्षण व्यवस्था आवश्यक
पुणे- स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राष्ट्रीय शिक्षण देणार्या शाळा शासकीय झाल्या. परंतु बि‘टिश शिक्षण पध्दती तशीच सुरू राहीली. शिक्षण प्रणालीत भारतीय, राष्ट्रीय, सांस्कृतिक पध्दतीने ज्ञानदान होणे आवश्यक असते. येणार्या काळात भारतीय चिंतनावर आधारित बदल शिक्षण व्यवस्थेत झाले असते तर आज सामाजिक परिरिस्थती अधिक एकात्मिक झाली असती, असे मत अहमदाबादच्या पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलगुरु इंदुमती काटदरे यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक दिनानिमित्त या शैक्षणिक वर्षात विशेष गुणवत्ता प्राप्त करणारे विद्यार्थी, क‘ीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणारे विद्यार्थी आणि एम. ङ्गिल, पीएच. डी. परीक्षेतील यशस्वी कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला. सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक‘माचे अध्यक्ष होते. सोसायटीचे संचालक किरण शाळिग‘ाम, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ व्यासपीठावर उपस्थित होते.
श्रीमती काटदरे पुढे म्हणाल्या, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण देणार्या शिक्षण संस्था निर्माण करणे हे प्रमुख उद्दीष्ट होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विविध क्षेत्रांत गुणवान व कर्तृत्वसंपन्न व्यक्ति असाव्यात म्हणून अनेक संस्था सुरू झाल्या. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत राष्ट्रीय शिक्षण हा विषय लावून धरल्यास नजिकच्या दहा वर्षांत मोठा बदल दिसून येईल. राष्ट्रप्रेमाने अधिक भारावलेली युवकांची पीढी निर्माण होईल.
बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी प्रास्ताविक भाषण केले. कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांनी संस्थेच्या अहवालाचे वाचन केले. डॉ. सविता केळकर व प्रा. मंजुषा गोखले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. बीएमसीसीचे उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. ए. कुलकर्णी यांनी आभार मानले.