किन्नर सन्मान सोहळा – एक पाऊल नकाराकडून स्वीकाराकडे
पुणे :”किन्नर सन्मान सोहळा “हे शब्द ऐकल्यानंतर आज हि “काय” ? असा प्रति प्रश्न आलंय . हो … येत्या रविवार २० मे २०१८ रोजी बालगंधर्व रंग मंदिर पुणे येथे बाबा ग्रुप ऑफ कंपनीस ,एन २४ इंटरटेन्मेन्ट ,ऑल सोर्स मीडिया यांच्या संकल्पनेतून दुपारी १२:३० वाजता सुरुवात होणार एका नव्या पर्वाला …. !
किन्नर सन्मान सोहळा – एक पाऊल नकाराकडून स्वीकाराकडे …..
घरामध्ये मुलांचा किंवा मुलीचा जन्म झाला तर आनंद साजरा केला जातो पण किन्नर हि निसर्गाचीच देणगी आहे . अनेक समाज गैर समजातून त्यांना समाजाचा भाग म्हणून देखील स्वीकारले जात नाही. अशा परिस्थिती अनेक पातळयांवर लढून त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले . त्यापैकी कित्येक जणी वैश्या व्यवसायातील भगिनींच्या मुलांना आई आणि बापाचे सुख देत आहेत . विद्यादान ,समाजकार्य या कला क्षेत्रात नाव कमवतात . पण आज हि त्यांना मोठं मोठ्या मॉल मध्ये अपराध्या सारखे वागवून प्रवेश नाकारे प्रयन्त अविचार केला जातो .
सत्य समाज -गैरसमजांना संपविण्यासाठी चला एक पाऊल नाकाराकडून स्वीकाराकडे उचलुया ….
तुमच्या आमच्या सारखेच समाजाचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी श्रम घेतले आहेत . त्याचाही सन्मान करूयात …..!
हा पुरस्कार सोहळा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यामध्ये पुण्यनगरीच्या पालकमंत्री नामदार गिरीश बापट ,महापौर सौ मुक्त टिळक ,उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे ,खासदार
वंदना चव्हाण ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले हे उपस्थित राहणार आहेत.
हा पुरस्कार जे तृतीयपंथी असून ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली त्यांचा हा गौरव
संपूर्ण महाराष्ट्रातून तृतीयपंथी मधून निवड करण्यात आली. त्यामध्ये १० जणींची निवड करण्यात आली ते तृतीय पंथी{ पुणे ,मुंबई,दौड ,अकलूज }येथील आहेत.
किन्नर समाजात अनेक उत्तमोत्तम कलाकार आहेत ,समाजाकडून त्यांची दाखल घेतली जात नाही हे दुर्दव आहे त्यांच्या कलेला दाद मिळावी कामासाठी प्रोत्सहन आणि पुढील वाटचालीसाठी उमेद मिळावी यासाठी चित्रपट महामंडळाने या सोहळ्याला पाठींबा दिला आहे . समाज बदलत असताना तृतीय पंथाने कडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे . त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेटले पाहिझे. या भावनेला पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने बळकटी मिळेल . असे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले.
प्रामुख्याने मागण्या
१}नोकरीत आरक्षण पाहिजे
२}बलात्काराच्या घटना रोखण्याच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक म्हणन आय. टी कंपन्या ,रेल्वे ,वाहतूक गाड्या ,सोसायटी यामध्ये नेमणूक करावी.
३}प्रवासामध्ये सवलती मिळाल्या नाहीत अशा विविध मागण्याची निवेदन तृतीयपंथी समाजाद्वारे मंत्री पंकजा मुंडे याना देण्यात आले होते .
पुरस्कार सोहळ्यामध्ये सरपंच ,शिक्षक ,नृत्यांगना ,कवियत्री ,मेकअप आर्टिस्ट ,सोशल वर्कर यशस्वी होत असलेल्या तृतीयपंथांचा सन्मान करण्यात येणार आहे . अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या साहाय्याने बाबा ग्रुप ऑफ कंपनीस ,एन २४ इंटरटेन्मेन्ट ,ऑल सोर्स मेडिया ,सिद्धांत मीडिया यांच्या पुढाकाराने हि आगळी वेगळी संकल्पना प्रत्यक्षात साकारत आहेत .
या सन्मान सोहळ्यास सहकार्य अजित पाटील एंटरटेनमेंट ,शैलेंद्र फिल्म्स ,संगीत स्वर साधना ग्रुप ,सुत्रसंचलन दीपिका सोनावणे ,गो लेझर इंटरनॅशनल तसेच कार्यक्रम दिग्दर्शन आणि लेखन प्रवीण जोशी यांनी केले आहे ,आशुतोष वाडेकर स्कीट ग्रुप, प्रतीक डान्स अकादमी ,नृत्यप्रिया हे आहेत.
पुरस्कारार्थी यांची नावे
१}रंजिताबाई नायक -तृतीयपंथी प्रमुख गुरु
२}चांदणी गोरे -एन .जी .ओ निर्भया आनंदी जीवन
३}सोनाली दळवी -सोशल वर्कर
४}पन्ना गुरु -वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांची शाळा चालवत आहेत
५}माउली कांबळे -अकलूज
६}संचित पाटील -सोशल वर्कर
७}ऐश्वर्या बनसोडे -सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट
८}दिशा शेख -कवियत्री
९}रश्मी पुणेकर -पुणे महानगरपालिका कर्मचारी व आर्टिस्ट
१०}प्रेरणा वाघेला -अध्यक्ष ह्युमन राईट्स व सोशल वर्कर