सहकारी बॅंकांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे-गिरीश बापट
पुणे-उद्यम विकास सहकारी बॅंकेने तब्बल ९०० रिक्षा चालकांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करुन दिले आणि पिग्मी एजंटच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना बचतीसाठी प्रेरित केले हे स्पृहणीय असुन सहकारी बॅंकांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे आणि सामान्य माणसाला बॅंकेचा आधार वाटावा असा कारभार करावा असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.सामान्य कर्जदार हा प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करतो आणि बॅंकेच्या आधाराने कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो असे ही ते म्हणाले.उद्यम विकास सहकारी बॅंकेच्या नवव्या (९व्या) धनकवडी सातारा रस्ता शाखेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेशराव कर्पे,आ.भीमराव तापकीर,बॅंकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर,उपाध्यक्ष सौ लीना अनासकर,संचालक महेश लडकत,दिलीप उंबरकर,मनोज नायर,सीताराम खाडे,शिरीष कुलकर्णी,राजन परदेशी,गोकुळ शेलार,पांडुरंग कुलकर्णी,महेंद्र काळे आणि दिनेश गांधी उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर दत्तात्रय धनकवडे,नगरसेवक महेश वाबळे,सौ मानसी देशपांडे,सौ मंजुश्री खर्डेकर,सौ राणी भोसले,सौ साईदिशा माने,रा स्व संघाचे भाग संघचालक अरविंदराव साठे,पतित पावन संघटनेचे शहर अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण,भाजप चे पर्वती मतदारसंघाचे अध्यक्ष हरीश परदेशी,खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष अरुण राजवाडे,भारतीय मजदूर संघाचे अण्णा धुमाळ,माथाडी आघाडीचे संतोष कांबळे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पालक मंत्री बापट साहेबांच्या हस्ते रिक्षाचालकाना चाव्या देण्यात आल्या.तसेच बॅंकेचे खातेदार असलेले व रिक्षात विसरलेल्या ४ लाखांच्या दागिन्यांची पिशवी प्रामाणिकपणे परत करणारे रिक्षा चालक संजय बिबवे यांनाही सन्मानित करण्यात आले.
बॅंकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक करताना बॅंकेच्या प्रगतीचा आलेख मांडला.अवघ्या ५ वर्षात बॅंकेच्या ठेवी ५६ कोटी वरुन ११५ कोटी वर पोहोचल्या असून ७७ कोटी कर्जवाटप झाले आहे व १८५ कोटीचे भाग भांडवल असून बॅंकेने ग्राहकांना सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.ए टी एम,फ्रॅंकिंग,सर्व प्रकारचे कर भरण्याची सुविधा यासह सर्व यंत्रणा उपलब्ध असल्याचे ही ते म्हणाले.
प्रामाणिक कर्जदार आणि सचोटीचा व्यवहार हे सहकारी बॅंकांचे संचित असून उद्यम बॅंकेचे कामकाज उत्तम प्रकारे चालत आहे व बॅंक प्रगतीपथावर आहे याबाबत समाधान व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेश कर्पे यांनी संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग हातात हात घालून काम करतात व त्यातूनच प्रगती साध्य करता येते असे सांगितले.
बॅंकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले,शिरीष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर दिलीप उंबरकर यांनी आभार प्रदर्शन केले.
आपला,