पुणे-नागरिकांना अनेक प्रश्न भेडसावत असतात मात्र या सर्व नागरी प्रश्नांची सोडवणूक ही नागरिक व लोकप्रतिनिधींमधील सुसंवादानेच होवु शकते असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी शहर संघचालक बापूसाहेब घाटपांडे यांनी व्यक्त केले.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या विकासनिधीतून ताथवडे उद्यान मार्गावर करण्यात येणाऱ्या पदपथाच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,प्रभाग १३ चे सरचिटणीस बाळासाहेब धनवे व भाजपचे पदाधिकारी मयुर देशपांडे,विकी धडफळे,जगदीश डिंगरे,सुयश गोडबोले,प्रवीण जोशी,सुलभा जगताप,रुपालीताई मगर,सुवर्णाताई काकडे,समीर ताडे इत्यादीनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या समजून घेतल्या.
इमारतींच्या फ्रॅंट मार्जिन/साईड मार्जिन मधील अतिक्रमण,बेवारस वाहने,रस्त्यावर थाटलेले गॅरेज व इतर व्यवसायाबाबत नागरिकांमधे प्रचंड संताप असल्याचे दिसून आले तर बागेच्या परिसरात मुलामुलींचे अश्लील चाळे,सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान,मद्यपान – यावर कारवाई न करणारे प्रशासन याबाबतीत नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
यावर बोलताना बापूसाहेबांनी वरील मत व्यक्त केले तसेच आपल्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व भाजपचे कार्यकर्ते समस्यांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच ” नागरिकांनी केवळ प्रश्न मांडू नयेत तर त्यांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा व सक्रिय सहभाग नोंदवावा असे ही ते म्हणाले.
मी प्रभागातील प्रत्येक काम नागरिकांच्या मागणीनुसार करत असून हा पदपथ करताना त्यावरील बंद पडलेले विजेचे खांब काढणे,वाळून गेलेली झाडे व फांद्या कापणे,ड्रेनेज ची झाकणे समपातळीवर करणे,ही कामे प्राधान्याने केली जातील असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.तसेच आत्ता नागरिकांनी मांडलेल्या समस्यांबाबत मी संवेदनशील असून प्रशासनाने याची दखल घेउन कारवाई करावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन असे ही त्यांनी सांगितले.स्मार्ट शहराच्या संकल्पनेत नागरिकांना चालण्यासाठी प्रशस्त व अतिक्रमणविरहित पदपथ असावेत,उत्तम सायकल ट्रॅक असावेत तसेच नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करावा हा आधार ठेवूनच मी उत्तम पदपथांची निर्मिती करत आहे असे ही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
यावेळी श्री.दांडेकर,नीताताई तळवलीकर,अश्विनीताई साठे,बी प्रकाश,स्वातीताई जोशी,प्रशांत हर्डीकर,सुरेश दीडमिशे,देशमुखताई,मिहिर केळकर,श्री करंदीकर इ स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून समस्या मांडल्या व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केलेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त केले.
संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन,रुपालीताई मगर यांनी स्वागत तर बाळासाहेब धनवे यांनी आभार प्रदर्शन केले.