पुरंदरेंना पुरस्कार देवून सरकारने केला शिवप्रेमींचा अवमान- संतोष शिंदे
पुणे-ब. मो. पुरंदरे यांना ‘पद्मविभूषण’ देणे हा तमाम शिवप्रेमींचा अपमान आहे… हा पुरस्कार बदनामी करण्याचे सरकारचे अधिकृत सर्टिफिकेट आहे… यामुळे महाराष्ट्रात वादळ निर्माण होईल असा स्पष्ट इशारा संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी दिला आहे .
याबाबत शिंदे यांनी प्रसिद्धीस मेल द्वारे पाठविलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि,ब. म. पुरंदरे यांना कलाक्षेत्रात सर्वोच्च ‘पद्मविभूषण पुरस्कार’ जाहीर झाला परंतु पुरंदरे यांचे ‘कला व साहित्य’ क्षेत्रातील योगदान ‘विकत घेऊन दिलेले आहे, मोफत नाही.’ पुरंदरेनी एकही पोवाडा गायलेला नाही, ते शाहीर नाहीत. शाहिरीतून कुठलीही ‘कला’ त्यांनी आजपर्यंत प्रसिद्ध केलेली नाही. ‘राजा शिवछत्रपती’ नावाच्या पुस्तकात पान क्रं. १२६ वर ‘चुकीचा आणि घाणेरडा इतिहास लिहून साहित्यातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार ‘राजा शिवछत्रपती’ पुस्तकांमध्ये पुरंदरेंनी लिहिला आहे.’ याउलट खोटा इतिहास सांगून लोकांकडून पैसे घेतलेले आहेत. एकही कार्यक्रम किंवा पुस्तक पुरंदरेंनी फुकट दिलेलं नाही, किंवा ‘जाणता राजा’ फुकट दाखवलेला नाही. विकत घेतलेला योगदान यामुळे जर पद्म विभूषण, महाराष्ट्र भुषण मिळणार असेल तर महाराष्ट्रातला हा वद्रोही पुरस्कार म्हणून या पुरस्कारा कडे पाहिलं जाईल .’ म्हणजे समाजाला मोफत दिलेले योगदान हे राज्य सरकारने जाहीर करावे.
भारतरत्न, पद्मविभूषण हे ज्यांना दिले ते सर्व महाराष्ट्रातील ‘संघरत्न’ आहेत. केंद्र सरकारकडे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांना भारतरत्न मिळावा म्हणून शिफारस करण्यात आली होती. महाराष्ट्रातील तमाम लोकांची मागणी होती तरीही केंद्र सरकार आणि राज्य सरकारने भारतरत्न पुरस्कार या सन्माननीय समाजसुधारकांना दिलेला नाही. हाच वैचारिक खोटारडेपणा केंद्र आणि राज्य सरकारने स्पष्ट केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आयुष्यभर जोगवा मागणे किंवा खोटा इतिहास सांगणे आणि लिहिणे यामुळे जर पद्मविभूषण मिळणार असेल तर त्या पुरस्कराची आज उंची खुंटली आणि महाराष्ट्र पुरस्कारा विना पोरका झाला असेच म्हणावे लागेल.
पुरंदरेंच्या या पुरस्कारामुळे राज्यातील नवे देशातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा काम केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन शिवप्रेमींच्या आणि महाराष्ट्रामध्ये जो संताप निर्माण करण्यात आलेला होता त्याच्या त्या शिवप्रेमींच्या संतापला आग लावण्याचे काम केंद्र सरकारने आज केलेला आहे. या ‘पद्मविभूषण’ पुरस्काराचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो. सरकारने पुरंदरे यांना हा पुरस्कार देऊ नये, व तात्काळ पाठीमागे घ्यावा, अशी ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंती करतो.