पुणे-पुणे सातारा सांगली कोल्हापूर महामार्गावर किमान धरा दिवस ‘टोल’ वसुली बंद करा अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी केली आहे .
ते म्हणाले,’सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पुरपरिस्थिती अत्यंत भयानक आहे. या भागातील लोकांना खायला अन्न नाही, राहिला घर नाही आणि घालायला कपडे सुद्धा उपलब्ध नाहीत. महाराष्ट्रभरातून मदतीसाठी लोक पुढे येत आहेत. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड आणि इतर संस्था, संघटना, गणेश मंडळ, सामाजिक संस्था, मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. बरेच कार्यकर्ते मंडळी या पूरग्रस्त लोकांसाठी मिळेल त्या गाड्या घेऊन… सातारा सांगलीकडे येत आहेत. मात्र पुणे – सातारा सांगली – कोल्हापूर या मार्गावर खेड-शिवापूर पासून ‘टोल’ सुरू होतात. महाराष्ट्राच्या इतर भागातून ही या मार्गाने बरेच लोक वाहतूक करत आहे. यामुळे मदत करणाऱ्या हातांना ‘टोल’ वसुलीचा भुर्दंड पडत आहे. म्हणून राज्य सरकार पुणे जिल्हाधिकारी व रस्ते विकास महामंडळ, व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण… यांना विनंती आहे की… या महामार्गावरील १५ (पंधरा) दिवसांसाठी ‘टोल’ वसुली तात्पुरती थांबवावी, बंद करावी.
खेड – शिवापूर ते कोल्हापूरच्या या मार्गावर टोलवसुली सुरू आहे. दिवसभर व रात्री अपरात्री मध्यरात्री या मार्गावरून मदतीच्या गाड्या वाहतूक करणार आहेत. मदतीसाठी जाणाऱ्या बहुतेक लोकांच्या आमच्याकडे तक्रारी येत असून लोकांकडून विनंती करण्यात येत आहे. या मार्गावरील ‘टोल’ वसुली तत्काळ थांबवावी. या मार्गावर 65 रुपये ते 95 रुपये पर्यंत टोल वसुली केली जाते. हे सामाजिक जाणिवेतून स्वयंप्रेरणेने मदतीचे हात पुढे येत असताना प्रशासनाने १५ दिवस टोलवसुली बंद करून मदत करणाऱ्या नागरिकांना सहकार्य करावे. अशी पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.
पुर परिस्थिती महा भयानक असल्याने लोकांना मदत करणे गरजेचे आहे. उद्या पासून ‘संभाजी ब्रिगेड’ व शिवप्रेमी संघटनांच्यावतीने औषधे कपडे अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू इत्यादी देण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे बरेच लोक सहकार्य करण्यासाठी प्रत्यक्ष जाणार आहेत. जर यासाठी कुणाला मदत करण्याची इच्छा असेल तर आमच्याशी संपर्क साधावा…
कैलास वडघुले 8329373670, प्रशांत धुमाळ 9881402241, सौरभ भिलारे 7286086412, संतोष शिदे 9850842703 यांच्याशी संपर्क करावा. तुम्ही दिलेले कपडे भिजलेल्या माणसाच्या आरोग्याचा संरक्षण करतील हीच अपेक्षा आहे. स्थानिक प्रशासनाची चर्चा करून एखादं गाव दत्तक घेऊन गावामध्ये स्वच्छता व आरोग्य कॅम्प लावण्याचा संभाजी ब्रिगेडचा मानस आहे.
‘टोल’ वसुली तात्पुरती रद्द करण्याची प्रशासनाला विनंती आहे.’ याबाबत पुणे जिल्हाधिकारी सातारा जिल्हाधिकारी सांगली व कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत आम्ही पाठपुरावा करून पंधरा दिवस टोलवसुली बंद झाली पाहिजे. ही विनंतीवजा मागणी करत आहोत. कृपया प्रशासनानेही दखल घ्यावी.