यावेळी बोलताना ते म्हणाले की, वाढते नागरीकरण लक्षात घेता सुरक्षा रक्षकांची नजीकच्या भविष्यात मोठ्ठया प्रमाणात गरज भासणार आहे, अशावेळी योग्य रीतीने प्रशिक्षित सुरक्षा रक्षक घडविणाऱ्या संस्थेची नितांत गरज आहे, आज भारत शिल्ड फोर्स ही गरज नक्की पूर्ण करेल हा विश्वास वाटतो. सचिन मोरे या धडाडीच्या युवकाने दूरदृष्टीने सुरु केलेली हि संस्था अद्ययावत सुरक्षा पुरविणारी संस्था ठरेल तसेच अनेक गरजू होतकरू विशेषतः पोलीस भरती व लष्कर भरतीमध्ये अपयश येणाऱ्या युवक -युवतींना याद्वारे करिअरची एक नवी दिशा प्राप्त होईल असा विश्वास मोराळे यांनी व्यक्त केला. भारत शिल्ड फोर्स सारख्या संस्थानी नागरी, औद्योगिक व व्यापारी अशा सर्वच भागात अद्ययावत यंत्रणांनी सुसज्ज व प्रशिक्षित असे सुरक्षा रक्षक नेमल्यास वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, सुरक्षा क्षेत्र हे खूप वेगाने वाढणारे क्षेत्र असल्याने केंद्र शासनानेही स्वतंत्रपणे या क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यासाठी सिक्युरिटी सेक्टर स्किल कौन्सिलची स्थापना केली आहे तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीद्वारेही ‘ सिक्युरिटी ‘ क्षेत्रातील प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे, यामुळे बेरोजगार युवकांना खात्रीचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
तर यावेळी आपल्या मनोगतात भारत शिल्ड फोर्सचे संस्थापक सचिन मोरे यांनी सांगितले कि, जगाच्या नकाशावर पुणे हे खूप वेगाने विकासाच्या दिशेने वाढणारे शहर असल्याने आय. टी. कंपन्या, मेट्रो, स्मार्ट सिटी होत असतानाच अद्ययावत अशा सुरक्षा रक्षकांनाही मोठी मागणी वाढत आहे. अशावेळी बेरोजगार युवकांना भारत शिल्ड फोर्सच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.तसेच पहिल्या टप्यात सुमारे दोन हजार जणांना हि रोजगार संधी उपलब्ध होत आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला निवृत्त कर्नल विश्वनाथ कराड, बीएसएफचे महाव्यवस्थापक संजय पटवर्धन, प्रा.डॉ. किशोर राजगुरू, खंडाळा विकास ग्रुपचे सचिव दिगंबर कदम व पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर येथील विविध सुरक्षा रक्षक पुरवठादार संस्थाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.