पुण्यात पावसाचे तांडव
पुणे-बुधवारी रात्री पावणेनऊ वाजता सुरु झालेल्या मुसळधार पावसाने दक्षिण पुण्यात एकच हाहाकार उडवून दिला असून अरण्येश्वर येथील टांगेवाले कॉलनीतील काही जणांचा मृत्यु झाला आहे. आणखी काही ठिकाणी लोक वाहून गेल्याची माहिती आहे. या पावसाने किती प्रचंड नुकसान झाले, याची भीषणता आज सकाळी दिसून आली. रात्री अचानक पावसाचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, काही ठिकाणी लोक पाण्यात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच पाण्याच्या प्रवाहात शहरातील अनेक भागात शेकडो वाहने वाहून गेले आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाल्याचे पहायला मिळत आहे.
अरण्येश्वर परिसरात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यु
कात्रज परिसरात बुधवारी रात्री दोन तासात प्रचंड जोरात पाऊस झाल्याने कात्रज तलाव भरुन वाहू लागला होता.
मित्र मंडळ चौकानजीकच्या आंबील ओढा ला आलेल्या पुरात सापडलेल्या अवघ्या एक वर्षा च्या मुलाला अग्निशमन दलाचे जवान मारुती देवकुळे यांनी मित्रमंडळ चौक येथे पाण्यात अडकलेल्या बाळाला कर्तव्य तत्परतेने पहा कसे वाचविण्यात आले या व्हीडीओ मध्ये