पुणे-राज्यात सत्ता, केंद्रात सत्ता ,आणि पालिकेत सत्ता तरीही जनता सोडा ,कार्यकर्ताच उपेक्षित … २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर आम्ही पक्षाचे राजीनामे देऊ .. असा सज्जड इशारा भाजपच्या एकमेव खासदाराला जुन्या कार्यकर्त्यांसह अनेकांनी दिल्याचे वृत्त आहे.
खासदार शिरोळेंनी प्रयत्न करूनही त्यांना दिल्ली ,मुंबईने जुमानले नाही ,त्यांच्या कार्यकर्त्यांना ते बळ देवू शकले नाही … एवढेच काय पुण्यातील कोणीही आमदार,खासदार, मंत्री हे आपल्या कार्यकर्त्यांची महामंडळ आणि समतुल्य समित्यांवर नियुक्त्या करून त्यांना बळ देवू शकलेले नाही . किंवा त्यांनी तसा प्रयत्नच केला नाही अशा कारणांनी शहर भाजप मधील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरत आहे… उपयोग काय ,सत्ता सगळीकडे आमच्या पक्षाची…आणि प्रत्यक्षात जनता सोडा…आमचीही कुठे वर्णी लागेना ..अशी असंख्य कार्यकर्त्यांची तक्रार आहे .
या पार्श्वभूमीवर लोकसभा ,विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वेळीच कार्यकर्त्याला बळ द्या ,अन्यथा निव्वळ नेतेच उरतील कार्यकर्ते उरणार नाही अशी स्थिती भाजपची झाल्याशिवाय राहणार नाही असा दावा केला जातोय. .
कॉंग्रेसचे जे झाले ,नेते वीस आणि कॉंग्रेस धुळीस ..तशीच काही अवस्था भाजपची होऊ शकते ,असे सांगितले जाते . पुण्यात कॉंग्रेस ला कलमाडी नंतर कोणी एक नेता लाभला नाही .तसाच काहीसा प्रकार भाजपचाहि आहे . सर्वत्र सत्ता असूनही भाजपचा येथील कारभार एकसूत्री असा नाही . बहुसमावेशिक नेतृत्वाचा फटका कॉंग्रेसने खाल्ला आहे. भाजप मध्ये पालकमंत्री बापट,खासदार शिरोळे आणि खासदार काकडे,शहराध्यक्ष गोगावले अशी नेत्यांची फळी आहे. पण त्याबरोबरच अन्य सात आमदार हि स्वयंघोषित नेतृत्वाकडे वाटचाल करीत आहेत . खरे सांगायचे तर येथे हि एक असा कोणी नेता नाहीच .सगळी भेळ-मिसळ झाली आहे ,त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यमंत्री ..यांच्याकडे पाहिले जाते. म्हणजेच पुण्याचे नेतृत्व ..राज्याच्याच नेतृत्वाच्या कडे आहे. आता राज्याचा आणि नागपूरचा कारभार पाहता पाहता ,मुख्यमंत्र्यांना पुण्याकडे पाहण्यास कितीसा वेळ मिळणार ? शिवाय येथील सर्व नेते स्वयंघोषित … या परिस्थितीत येथील भाजपमधील कार्यकर्ता उपेक्षित राहतो आहे. पुण्यात कार्यालये असलेल्या महामंडळांवर कोल्हापूरच्या चंद्रकांत दादांनी आपले कार्यकर्ते बसविले.पण पुण्यातल्या आमदारांना मात्र येथे दुसरी फळी निर्माणच होऊ द्यायची नसावी .आपल्याला पर्याय कोणी दिसूच द्यायचाच नाही,निव्वळ स्वतःचेच पहायचे .. अशीच भूमिका त्यांची असावी असा त्यांचा कारभार राहिला आहे असा आरोपही होतो आहे.
या सर्व परिस्थितीत काही कार्यकर्त्यांनी पुण्याच्या एकमेव खासदारांकडे जाऊन हि सारी गाऱ्हाणी मांडली तेव्हा कार्यकर्त्यांच्या नियुक्त्यांसाठी आपण दिल्लीला पाठवलेली सारी पत्रे त्यांनी दाखविली .पण त्या त्या क्षेत्रातील तज्ञांचीच नावे द्या असे सांगत दिल्लीश्वरांनी पुण्यातल्या कार्यकर्त्यांच्या हाथी तुळशीपत्र ठेवले .या पार्श्वभूमीवर निवडणूक जाहीर झाल्यानंतर जेव्हा कधी पक्षाचे नेते काही निर्णय घेत जातील तेव्हा तेव्हा भाजप फुटीच्या मार्गावर दिसल्यास नवल वाटणार नाही अशी स्थिती आहे.