पुणे- मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, यासाठी काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर आज पुण्याची फसवणूक झाल्याचा आरोप करीत पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबाबत संताप व्यक्त करीत पुणे जिल्ह्यातील वकिलांनी आज (गुरुवारी) कामकाजावर बहिष्कार टाकला ,आणि जोरदार घोषणाबाजी केली .बार असोसिअशन चे पदाधिकारी, तसेच अनेक वकिलांनी स्वयंस्फुर्तीने यावेळी निदर्शने केली या मध्ये सुरेश बोराटे,राणी राम कांबळे , रुपाली पाटील ,मोहन वाडेकर , अॅड. सुहास पडवळ, अॅड. अतिश लांडगे, अॅड. सुनील कड, अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. गणेश राऊत, अॅड. प्रसन्ना लोखंडे, अॅड. सुनील कड, अॅड. विक्रम यादव आदि मान्यवर सहभागी झाले होते .आता थांबणार नाही … तर बापटांच्या घरावर मोर्चा .. असे इशारे यावेळी दिले गेले ..
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आपल्याच जिल्ह्यात व्हावे या मागणीसाठी पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वकिलांनी सातत्यातने पाठपुरावा केला आहे. यासाठी मोर्चे, कामबंद आंदोलनेही झाली आहेत. परंतू बुधवारी मुख्यमंत्र्याच्या दालनात झालेल्या बैठकीत कोल्हापूर खंडपीठासाठी शंभर कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्याती ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याच्या वृत्त समजताच शिवाजीनगर न्यायालयातील वकीलांमध्ये खळबळ उडाली .
यावेळी बोलताना पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र दौंडकर म्हणाले, ” मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच पुण्यात खंडपीठ व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी न्यायमूर्ती चेल्लूर यांच्यासमोर या मागणीचा प्रस्ताव ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु काल झालेल्या बैठकीदरम्यान पुण्यातील खंडपीठाबाबत विचार न केल्यामुळे आज शिवाजीनगर न्यायालयातील कामकाज बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला.दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे व्हावे, या मागणीसाठी आज पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनच्यावतीने देखील एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर म्हणाले, ” महाराष्ट्र सरकारने पुण्यास खंडपीठ देण्याचे आश्वासन दिले होते पण ते खोटे ठरले. ही सरकारची नामुष्की असून वकिलांची व जनतेची फसवणूक आहे. कोल्हापूरला खंडपीठ मिळाल्याचा आनंदच आहे पण हायकोर्टात जाणारी सर्वात जास्त प्रकरणे ही पुण्याची असताना देखील पुण्यावर अन्याय का ? ” असा सवाल देखील अॅड. पुणेकर यांनी बोलून दाखविला.माजी अध्यक्ष अॅड. सुहास पडवळ म्हणाले, ” काम बंद करण्याची वेळ शासनाने आणली असून या निष्क्रीय शासनास लवकर जाग न आल्यास व पुण्यास खंडपीठ न मिळाल्यास आंदोलन तीव्र करणार” असल्याचे सांगितले.