पुणे-सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२६ वे वर्ष असताना देखील पुणे महापालिकेच्यावतीने १२५ वे वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याविरोधात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्यावतीने आजपासून २३ तारखेपर्यंत चक्री उपोषणास सुरु केले आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील त्यांनी दिला.
मंडळाचे विश्वस्त सुरज रेणुसे म्हणाले, यंदाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२६वे वर्ष असून देखील हे सरकार आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही. याच्या निषेधार्थ आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव सुरु होण्यास अगदी काही दिवस शिल्लक राहिले असून सरकारने भुमिका जाहिर करावी. अन्यथा आमचा लढा अखेरपर्यंत सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
.. आज भाऊ रंगारी ट्रस्ट चे सुरज रेणुसे यांनी उपोषणाला बसल्यावर मीडियाशी साधलेला संवाद ….
याप्रकरणी यापूर्वी मंडळाकडून मंडई येथिल चौकात काळया फिती बांधून आंदोलन करण्यात आले होते