पुणे -जिल्ह्यातील पुणे शहर व बारामती लोकसभा मतदारसंघात उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसने अद्यापही उमेदवारी जाहीर केलेली नाही. तर बारामती मतदारसंघात भाजपच्या रंजना कुल आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान तिस-या टप्पामध्ये महाराष्ट्रातील 14 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी आजपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. आज दि. 28 मार्च ते 4 एप्रिल 2019 पर्यंतच्या कालावधीत तिसरा टप्पा करीता नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. तिसरा टप्पा करीता 28 मार्च 2019 उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 23 एप्रिलला मतदान होणा-या या तिस-या टप्यातील 14 लोकसभा मतदारसंघामध्ये ३-जळगाव लोकसभा मतदारसंघ, ४-रावेर लोकसभा मतदारसंघ, १८-जालना लोकसभा मतदारसंघ, १९-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ, ३२-रायगड लोकसभा मतदारसंघ, ३४-पुणे लोकसभा मतदारसंघ, ३५-बारामती लोकसभा मतदारसंघ, ३७-अहमदनगर लोकसभा मतदारसंघ, ४३-माढा लोकसभा मतदारसंघ, ४४-सांगली लोकसभा मतदारसंघ, ४५-सातारा लोकसभा मतदारसंघ, ४६) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ, ४७-कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ, ४८-हातकणंगले लोकसभा मतदारसंघ यांचा समावेश आहे. या 14 मतदारसंघात अजूनही काही राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर केलेली नाहीत तर काही जागांवर उमेदवार नावे जाहीर केलेली आहेत. लोकसभेच्या तिस-या टप्प्यातील निवडणुकीसाठी उद्या गुरुवारपासून 28 मार्च 2019 उद्यापासून अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. मात्र, कॉंग्रेस आघाडीतील उमेदवारांच्या नावाबाबत अद्यापपर्यंत घोळ सुरूच आहे. उद्या गुरुवार 28 मार्चपासून संबधित जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे नामनिर्देशनपत्रे 4 एप्रिल 2019 पर्यंत (सार्वजनिक सुटीव्यतिरीक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहेत. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र विहीत नमुना 2 अ मध्ये सादर करणे आवश्यक आहे. उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास एक प्रस्तावक आवश्यक आहे. सदर प्रस्तावक हा संबंधित लोकसभा मतदारसंघाचा मतदार असावा. स्वतंत्र व मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षाचा उमेदवार असल्यास त्यांना 10 प्रस्तावक असणे आवश्यक आहे. व तो नामनिर्देशनपत्र ज्या लोकसभा मतदारसंघातून भरणार आहे त्या लोकसभा मतदारसंघातील मतदार असणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार विहीत प्रपत्रातील प्रपत्र 26 (भाग-अ, भाग-ब आणि सत्यापन)चे शपथपत्र शपथआयुक्त किंवा प्रथमश्रेणी दंडाधिकारी किंवा लेख प्रमाणक यांच्यासमोर शपथबद्ध करणे आवश्यक आहे. शपथपत्रातील सर्व रकाने भरणे आवश्यक असून, कोणताही रकाना रिक्त ठेवू नये. कोणत्याही बाबींच्या संबंधात कोणताही रकाना न लिहिता रिक्त ठेवू नये. निरंक (Nil) किंवा लागू नाही (Not Applicable)) किंवा माहीत नाही (Not Known) असे त्या रकान्यामध्ये नमूद करावे. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार शपथपत्रात भाग ‘अ’ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ई-मेल आयडी, संपर्क दूरध्वनी क्रमांक, समाजमाध्यम खाते असल्यास नमूद करणे आवश्यक आहे. ज्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावयाची आहे, त्या मतदारसंघात उमेदवारांचे नाव नसल्यास ज्या मतदारसंघातील मतदार यादीत उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदारसंघातील मतदार यादीची प्रमाणित प्रत नामनिर्देशन पत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, मान्यता प्राप्त पक्षाचा उमेदवार असल्यास अ व ब फॉर्म नामनिर्देशन पत्रासोबत किंवा नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या अंतिम दिनांकास दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. मतदारसंघ राखीव असल्यास नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अमानत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांसाठी 25 हजार व अनुसूचित जाती – जमातीसाठी 12 हजार 500 रुपयेप्रमाणे आवश्यक आहे. अनामत रक्कम रोख किंवा रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, शासकीय कोषागार येथे चलनद्वारे भरावी, धनादेश स्वीकारले जाणार नाही. नामनिर्देशन पत्रासोबत रोख रक्कमेची पावती, चलन सादर करणे आवश्यक आहे. निवडणूक खर्चाचे नियंत्रण सुलभ व्हावे, म्हणून उमेदवाराने नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या किमान एक दिवस अगोदर बँकेत स्वत:चे नावे व फक्त निवडणूक खर्चासाठी खाते उघडणे आवश्यक आहे व सदर खाते क्रमांकाची माहिती नामनिर्देशन पत्रासोबत लेखी स्वरुपात निवडणूक निर्णय अधिकारी यांना देणे आवश्यक आहे. गुरुवार दिनांक 4 एप्रिल 2019 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जातील. एक व्यक्ती जास्तीत-जास्त चार नामनिर्देशन पत्रे सादर करु शकते. तसेच एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन लोकसभा मतदार संघातून नामनिर्देशन पत्र सादर करु शकते. नामनिर्देशन पत्र सादर करताना उमेदवार व इतर जास्तीत – जास्त चार व्यक्ती असे एकूण जास्तीत-जास्त पाच व्यक्ती निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्षात हजर राहू शकतात. नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती कमाल तीन वाहनांच्या मर्यादेस अधीन राहून निवडणूक निर्णय अधिकारी यांचे परिसरात वाहने आणू शकतात.
लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा – असा आहे कार्यक्रम
गुरुवार – 19 मार्च : नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात
गुरुवार 4 एप्रिल : नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक
मंगळवार – 5 एप्रिल : नामनिर्देशन पत्राची छाननी
गुरुवार 8 एप्रिल : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक
गुरुवार 23 एप्रिल : मतदान
गुरुवार 23 मे : मतमोजणी
तिसऱ्या टप्यातील 14 लोकसभा मतदारसंघ-
३-जळगाव लोकसभा मतदारसंघ
४-रावेर लोकसभा मतदारसंघ
१८-जालना लोकसभा मतदारसंघ
१९-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ
३२-रायगड लोकसभा मतदारसंघ
३४-पुणे लोकसभा मतदारसंघ
३५-बारामती लोकसभा मतदारसंघ
३७-अहमदनगर लोकसभा मतदारसंघ
४३-माढा लोकसभा मतदारसंघ
४४-सांगली लोकसभा मतदारसंघ
४५-सातारा लोकसभा मतदारसंघ
४६) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ
४७-कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
४८-हातकणंगले लोकसभा मतदारसंघ
लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे-
नामनिर्देशन पत्र विहीत नमुना २ अ
नामनिर्देशन पत्रासोबत विहीत प्रपत्रातील प्रपत्र २६ (भाग-अ, भाग-ब आणि सत्यापन) चे शपथपत्र
मतदार यादीत उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदारसंघातील मतदार यादीची प्रमाणित प्रत
राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, मान्यता प्राप्त पक्षाचा उमेदवार असल्यास अ व ब फॉर्म
मतदारसंघ राखीव असल्यास नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र
नामनिर्देशन पत्रासोबत अनामत रोख रक्कमेची पावती, चलन सादर करणे आवश्यक आहे.
बँकेत स्वत:चे नावे फक्त निवडणूक खर्चासाठी खाते उघडणे व सदर खाते क्रमांकाची माहिती नामनिर्देशन पत्रासोबत लेखी स्वरुपात देणे आवश्यक आहे.
उमेदवारचे फोटो/रहिवास पुरावा/पॅन कार्ड साक्षांकीत प्रत
उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास एक प्रस्तावक आवश्यक आहे.
अपक्ष उमेदवार असल्यास त्यांना १० प्रस्तावक असणे आवश्यक आहे.
एक व्यक्ती जास्तीत-जास्त चार नामनिर्देशन पत्रे सादर करु शकते.
एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन लोकसभा मतदार संघातून नामनिर्देशन पत्र सादर करु शकते.
नामनिर्देशन पत्र सादर करताना उमेदवार व इतर जास्तीत – जास्त चार व्यक्ती हजर राहू शकतात.
नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीना कमाल तीन वाहनांची मर्यादा आहे.
(लेखक-चंद्रकांत भुजबळ, पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब))