कबुतरखाने तोडू नये, कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करू नये
मुंबई. भाजपचे ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईतील कबुतरखाना वाचवण्याची मागणी केली आहे. शिवाय कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या दंडावर बंदी आणावी, अशी मागणी त्यांनी मुंबई महानगरपालिकेकडे केली आहे. आमदार लोढा यांनी आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन दोन्ही मागणीवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही महिन्यापासून महानगरपालिका मुंबईतील जुने कबूतरखाने जमीनदोस्त आहेत. तसेच कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड आकाराला जात आहे. मुंबईतील गोलदेऊळ येथील ज्या गल्लीचे नाव कबूतर गल्ली आहे, तेथील कबूतरखानाही पालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आला आहे. या संदर्भात मनपा आयुक्तांशी झालेल्या बैठकीत जैन शक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष कनक परमार आणि राष्ट्रीय पशु कल्याण मंडळाचे सदस्य गिरीश भाईही आमदार लोढा यांच्यासह उपस्थित होते. या प्रकरणी आमदार लोढा यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. कबूतरांना दाणे टाकणे हा भारतीय परंपरेचा एक भाग आहे. जगभरात सार्वजनिक ठिकाणावर कबूतरांना दाणे टाकले जातात. मात्र मुंबईत महापालिकेकडून यावर बंदी घालणे म्हणजे भारतीय परंपरा आणि पौराणिक विश्वासांचे उल्लंघन असल्याचे आमदार लोढा यांनी या निवेदनात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेशात असे कुठेही नमूद नाही कि, कबुतरांना दाणे टाकणे बंद करा किंवा दाणे टाकणाऱ्यांकडून दंड आकारण्यात यावा, असे ते सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भत म्हणाले. तसेच आमदार लोढा यांनी कबूतरखान्यांना सुरु ठेवणे आणि कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांकडून मनपाद्वारे करण्यात येणारी कारवाई थांबविण्याची मागणी केली आहे. मनपा आयुक्तांनी याप्रकरणी कायद्यानुसार योग्य कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.