क्रीडापटू मुलींचा खेळ आकर्षणाचं केंद्र
मुंबई-
संपूर्ण जगासाठी एक प्रकारे आकर्षणाचं केंद्र असलेल्या मुंबईत यावेळी ‘सीएम चषक’ साठी महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांमधून येणाऱ्या क्रीडापटू मुलींचा खेळ आकर्षणाचं केंद्र बनला आहे. मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसापासून ‘सीएम चषक’चे अंतिम सामने रंगले आहेत. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात हे सामने सुरू आहेत. यामध्ये राज्यभरातून खेड्यापाड्यातून आलेल्या जवळपास दोन हजारांहून अधिक महिला क्रीडापटू सहभागी झाल्या आहेत. ज्यात अहमदनगरमधून ५८, अकोलामधून ४३, अमरावतीमधून ५६, औरंगाबादमधून ५६ बीडमधून ४२, भंडारामधून ५५, बुलढाणामधून ५६, चंद्रपूरमधून ४४, धुळेमधून ५२, गडचिरोलीमधून ४१, गोंदियामधून ५६, हिंगोलीमधून ४१, जळगावमधून ३०, जालनामधून ५५, कोल्हापूरमधून ५९, लातूरमधून ४०, मुंबई शहरमधून ३२, मुंबई उपनगरमधून ६०, नागपूरमधून ४४, नांदेडमधून ५४, नंदुरबारमधून ५४, नाशिकमधून ५४, उस्मानाबादमधून ४१, पालघरमधून ५६ पुणेमध्य १९, रत्नागिरीमधून ४६ सांगलीमधून ५४, सातारामधून ५४, सिंधुदुर्गमधून ५३, सोलापूरमधून ५४, ठाण्यामधून ५५, वर्धामधून ५५, वाशिममधून ४६, आणि यवतमाळमधून ५४ सहभागी झाल्या आहेत. सीएम चषक स्पर्धेने खेड्यापाड्यातील महिलांना हक्काचं क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या महिला विविध स्तरावरील टप्पे पार करुन विजेत्या झाल्या आहेत. रांगोळी, चित्रकला, गायन या स्पर्धांमध्ये महिलांनी विशेष सहभाग दर्शवला आहे, तर खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल या स्पर्धांमध्ये युवतींनी विशेष सहभाग दर्शवला आहे.