मुंबई-येणारी निवडणूक मोदींसाठी नव्हे तर देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाची असून देशाच्या विकासाचा वेग पुढील दहा वर्षे कायम ठेवायचा असेल तर मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी निवडून दिले पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मुख्यममत्री सांगीतले की, जंगलातली कितीही जनावरे एकत्र आली तरी ती सिंहाला हरवू शकत नाहीत. नरेंद्र मोदी वाघ आहे, आणि वाघाला कोणीही हरवू शकत नाही. असे सांगून ते म्हणाले की मोदी हे आज देशाचे वाघ आहेत. राज्यस्तरीय सीएम चषक स्पेर्धेचे समापन सोहळ्यावर मुंबईतील सोमैय्या मैदानात रविवारी सांयंकाळी पार पडलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाचे युवा महासंगम मध्ये पारितोषिक वितरण करताना मुख्यमंत्री बोलत होते.
युवा महासंगमच्या मंचावर यावेळी मुख्यमंत्री फडणवीस सोबत मंचावर शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार पूनम महाजन, ज्येष्ठ आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार योगेश टिळेकर देखील उपस्थित होते. मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्य़क्ष मोहित भारतीय यांच्याकडून सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि मान्यवरांना तलवार भेट करण्यात आली. आपल्या स्वागत भषणात भारतीय म्हणाले की मुख्यमंत्री फडणवीस म्हणजे युवाशक्तीचे प्रतीक आहेत. सीएम चषक स्पर्धेसाठी आणि युवमहासंगमसाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विशेष मेहनत घेतली.
मुख्यमंत्री फडणवीस युवा महासंगममध्ये आलेल्या जवळपास 50 हजार युवकांचे स्वागत केले आणि सांगीतले की, नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, पण विरोधकांकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही. बाकी सर्व नेते केवळ आपापल्या भागाचे नेते आहेत, पण मोदी देशात कुठेही गेले तरी लाखभर लोक सहज त्यांना ऐकण्यासाठी जमतात. आजवर अनेकदा देशात गरिबी हटाव ची घोषणा झाली पण गरिबी कधी हटली नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की फक्त कांग्रेसी नेत्यांचे शिष्यांचीच गरिबी हटली. परंतु आज मोदींच्या प्रत्येक योजनेमुळे खरी गरिबी हटविण्याची सुरुवात झाली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी, विकासासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करणे अवश्यक आहे त्यासाठी सर्व भाजयुमो कार्यकर्त्यांनी कसून काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले की बाज की उडान अभी बाकी है. रणांगणात गेल्यावर मोगलांचा खातमा करणारे मावळे मला समोर दिसत आहेत.