मुनगंटीवार आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या विकासाचा केला निर्धार
मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीचा दर्जा मुंबईला प्राप्त आहे, मात्र मुंबईच्या विकासाकरता अजून भरपूर काही करणं बाकी आहे. विकासाच्या या स्वप्नाला केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही मिळून पूर्ण करणार, असे वचन मुंबईकरांना महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिले. अर्थमंत्री मुनगंटीवार आणि आदित्य ठाकरे यांनी रविवारी दक्षिण मुंबई भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी आयोजित केलेल्या ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला. सकाळी दहा ते रात्रीपर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमात दक्षिण मुंबईतील जवळपास २० हजार सोसायटीतील प्रतिनिधी उपस्थित होते.
शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना आश्वासित केले की, सरकारला मुंबईच्या विकासासाठी मोठी कामे करायची आहेत. या दिशेत शिवसेना संपूर्णपणे सरकारच्या सोबत आहे. यामुळेच मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे पसरत आहे, नवीन वॉटर रिजॉवेयर जलद गतीने बनत आहेत. या कार्यक्रमात मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्राचा बजट प्रथमच सरप्लस गेला आहे. याचे श्रेय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या योग्य निर्णयांना जातो. कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना धन्यवाद करून या कार्यक्रमाचे आयोजक भाजप उपाध्यक्ष लोढा म्हणाले की, मनपा, प्रदेश आणि केंद्र सरकार यांची सांगड अशीच जुडलेली राहिली पाहिजे, तेव्हा दक्षिण मुंबई आणि मलबार हिलच्या विकासाला न्याय मिळेल. यावेळी दक्षिण मुंबई शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अरविंद सावंत म्हणाले की, त्यांनी मागील पाच वर्ष पूर्ण निष्ठेने आणि मेहनतीने काम केले. असंच काम ते पुढेही मुंबईच्या विकासासाठी करत राहतील.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन या कार्यक्रमात मुनगंटीवार, आदित्य ठाकरे आणि लोढा यांनी केले. तसेच उपस्थित नागरिकांच्या समस्यांचे निराकरण, विकास आधारभूत सुविधा आणि विविध लागू झालेल्या योजनांवर आधारित उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांचे संतोष जनक उत्तर दिले. कार्यक्रमात मुंबईतील व्यवसायिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्था आणि कामगार संघटनेचा प्रतिनिधींसह बँकर, डॉक्टर, वकील, इंजिनीयर आणि विविध स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.