2019 च्या अखेरीपर्यंत 7 मेगावॅट सौरउर्जा निर्मितीची योजना
पुणे-– ब्रिजस्टोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (ब्रिजस्टोन इंडिया) चे भारतातील दोन
सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून या माध्यमातून स्वच्छ उर्जा उपलब्ध झाली आहे. पश्चिम
भारतातील महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या चाकण येथील पुणे प्रकल्पाची सध्याची सौर क्षमता 1 मेगावॅटची
आहे. याठिकाणी आणखी 4 मेगावॅट क्षमतेची प्रक्रिया सप्टेंबर 2019 पर्यंत सुरू होईल. मध्य भारतातील
मध्यप्रदेशातील खेडा येथे 1 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प सुरू असून त्याची क्षमता आणखी एक मेगावॅटने
वाढविण्यात येणार असून 2019 च्या तिसऱ्या तिमाहीपासून कार्यरत होणार आहे.
ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पराग सातपुते म्हणाले की, “स्वच्छ उर्जेचा वापर हे
ब्रिजस्टोनचे प्रमुख स्थिर उद्दिष्ट्य आहे. याच जोडीने आपण सौर उर्जेचा अवलंब केल्यास, पारंपरिक उर्जा
प्रकारांवर विसंबून राहणे कमी होते, ज्यामुळे कार्बन उत्सर्जनालाही आळा बसतो. 1 मेगावॅट सौर क्षमता
दरवर्षी 1000 टन कार्बन उत्सर्जन थांबवते. या हिशोबाने दोन दशकांत 7 मेगावॅट सौर ऊर्जेमुळे 150,000
कार्बन उत्सर्जन टळेल. आमच्याकरिता भारतात, हे कंपनीच्या दीर्घकालीन वचनबद्धतेच्या दृष्टीने उचलले
पाऊल असून त्यामुळे 2050 आणि त्यापलीकडे 50% कपात गाठता येणार आहे.”
सौर उर्जेचा वापर पर्यावरणाच्या दृष्टीने हितावहच आहे, शिवाय आर्थिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम
दिसेल. 1 मेगावॅट सौर ऊर्जेमुळे 20 वर्षांमध्ये जवळपास 59 दशलक्ष रुपयांच्या वीज खर्चाची बचत होणार
आहे.
ब्रिजस्टोन ग्रुपचा भर ‘पर्यावरणा’वर आहे, कारण समूहाच्या सीएसआर वचनबद्धता ‘अवर वे टू सर्व” (सेवा
करण्याची आमची पद्धत) अनुषंगाने याला प्राधान्य देण्यात आले आहे. 2020 पर्यंत (2005 च्या तुलनेत)
कार्यवहन आणि उत्पादन वापरानंतर कार्बनडायऑक्साईडमध्ये 35 टक्क्यांची घट आणण्याचे लक्ष्य निश्चित
करण्यात आले आहे. त्याशिवाय 2050 आणि त्यानंतरच्या कालावधीसाठी समाजपूरक अक्षय्य उर्जा लक्षात
घेऊन दीर्घकालीन पर्यावरण उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी
कार्बनडायऑक्साईड घटविण्याची जाणीव मुख्य भूमिका बजावेल. ब्रिजस्टोन ग्रुपपैकी एक असलेली
ब्रिजस्टोन इंडिया सद्य आणि आगामी पिढ्यांसाठी आरोग्यदायक पर्यावरणासाठी काम करण्याकरिता
वचनबद्ध आहे.
‘अवर वे टू सर्व’ विषयी
2017 मध्ये शुभारंभ झालेले ‘अवर वे टू सर्व’ ब्रिजस्टोनच्या पुनर्रचित ग्लोबल कॉर्पोरेट सोशल
रिस्पॉन्सिबिलीटी (सीएसआर) वचनाचा भाग असून तीन प्राधान्य क्षेत्रांच्या केंद्रस्थानी आहे: मोबिलिटी
(गतिशीलता), पीपल (लोक) आणि एन्वायर्मेंट (पर्यावरण). “अवर वे टू सर्व” मध्ये कंपनीचे दीर्घकालीन
तत्वज्ञान “सर्विंग सोसायटी विथ सुपिरिअर क्वालिटी” (समाजाची सर्वोत्तम दर्जेदार सेवा) झळकते आणि ही
पावती आहे की, सर्वोत्तम कंपन्या केवळ त्यांच्या सहयोगींसोबत कार्यरत नसतात, तर उत्तम जगाकरिता
योगदान देत असतात.
ब्रिजस्टोन इंडियाबद्दल:
ब्रिजस्टोन इंडिया प्रा लिच्या कामकाजाला 1996 मध्ये सुरुवात झाली. मार्च 1998 मध्ये मध्यप्रदेशातील
खेडा येथे निर्मिती सुविधा स्थापण्यात आली. भारताच्या रस्त्यांकरिता ब्रिजस्टोन टायर्सची निर्मिती करून
भारताला धावते ठेवण्याचे ध्येय ब्रिजस्टोनने गाठले. 2013 मध्ये कंपनीने पुण्यातील चाकण येथे आणखी
एक सुविधा केंद्र उभारून आपला विस्तार वाढवला. 20 वर्षांहून अधिक कालावधीच्या आपल्या छोट्या
वाटचालीत ब्रिजस्टोन इंडिया प्रा. लि. ही ओईएम आणि रिप्लेसमेंट मार्केट अशा दोन्हीतील अग्रगण्य टायर
कंपन्यांपैकी एक मानली जाते.
ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनविषयी:
ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनचे मुख्यालय टोकयो येथे असून आज ती जगातील सर्वात मोठी टायर आणि रबर
कंपनी मानली जाते. या कंपनीने तयार केलेले टायर विविध कामांसाठी वापरण्यात येतात. त्याशिवाय
अनेक तऱ्हेच्या इतर उत्पादन श्रेणींची निर्मिती कंपनी करते, ज्यामध्ये औद्योगिक रबर आणि रासायनिक
उत्पादने व स्पोर्टींग वस्तूंचा समावेश आहे. त्यांची उत्पादने जगभरातील 150 हून अधिक राष्ट्रांत व प्रदेशांत
विकली जातात.