‘विद्यापीठ व्यवस्थापनातील माहिती तंत्रज्ञानाचे नवे प्रवाह ‘ विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे पुण्यात उदघाटन
पुणे :’असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’ आणि भारती अभिमत विद्यापीठाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या’विद्यापीठांच्या व्यवस्थापनातील माहिती तंत्रज्ञानाचे नवे प्रवाह’ या विषयावरील ३ दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन बुधवारी भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’ चे अध्यक्ष डॉ माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते झाले.
‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी‘ पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये ही कार्यशाळा झाली . उद्घाटन कार्यक्रमात संयोजक डॉ अमरेंद्र पणी ,डॉ एस एफ पाटील,आय एम ई डी चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर उपस्थित होते . विद्यापीठांचे देशभरातील ५० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत .
डॉ उषा राय नेगी,डॉ सचिन कदम ,डॉ श्याम शुक्ला ,डॉ स्वाती देसाई ,डॉ श्रद्धा वेर्णेकर ,डॉ श्वेता जोगळेकर हे संयोजन समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते . ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कार्यशाळेचा समारोप होणार आहे .