पुणे :भारती विद्यापीठ ‘कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ‘ तर्फे ‘एथिकल हॅकिंग आणि सुरक्षितता ‘ विषयावर तीन दिवसिय फॅकल्टी डेव्हेलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता . भारती विद्यापीठाच्या कात्रज कॅम्पस मध्ये ३ ते ५ डिसेंबर रोजी झालेल्या या चर्चासत्राचे उदघाटन प्राचार्य डॉ . आनंद भालेराव यांनी केले . डॉ .संदीप वांजळे यांनी स्वागत केले . ५ विद्यापीठातील २१ इन्स्टिट्यूट चे ३८ प्राध्यापक ,संशोधक या चर्चासत्रात सहभागी झाले . एकूण सहा प्रशिक्षण सत्रांमध्ये सायबर हल्ले आणि ‘एथिकल हॅकिंग ‘ विषयी सर्वंकष माहिती देण्यात आली .
उदघाटन सत्रात बोलताना डॉ . आनंद भालेराव म्हणाले ,’६५ हजार प्रशिक्षित हॅकर्स या क्षेत्रात कमी आहेत . आताच्या डिजिटल युगात सायबर हल्ल्यांमुळे कार्पोरेट क्षेत्राचे दरवर्षी अब्जावधींचे नुकसान होत आहे . हे सायबर हल्ले थोपविण्यासाठी चांगले काम करणाऱ्या एथिकल हॅकर्स ची गरज उद्योग क्षेत्राला भासत आहे . अजूनही ७८ टक्के आस्थापना आणि उद्योगांकडे सायबर हल्ल्याविरुद्ध करण्याच्या उपाययोजनासाठी नियोजन तयार नाही . त्यामुळे इथिकल हॅकर्स इथून पुढे मोठी मागणी असणार आहे . उद्योग जगात सायबर हल्ल्याबद्दलचे प्रशिक्षण ,उपाययोजना साठी मोठी गुंतवणूक करण्याच्या मनःस्थितीत आहे .
नॅसकॉम च्या अभ्यासानुसार भारतात ८० हजार एथिकल हॅकर्स ची आवश्यकता भासणार आहे ,मात्र ,आज केवळ १५ हजार प्रशिक्षित हॅकर्स उपलब्ध आहेत . या धोक्याविषयी जागृती घडवून आणण्याच्या हेतूने या फॅकल्टी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम चे आयोजन करण्यात आले होते .