भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांची ‘मुंबई आयआयटी रिसर्च इंटर्नशिप ‘साठी निवड
पुणे :भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांची मुंबई आयआयटीच्या ‘ रिसर्च इंटर्नशिप ‘साठी निवड झाली आहे . रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या गौरव गोयल (बी टेक सिव्हिल ),सुनाथ खाडिलकर (बीटेक -आय टी ), आदर्श कुमार (बीटेक -इलेक्ट्रिकल ),श्रुती माने (एम टेक -सिव्हिल )या विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य आणि अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. आनंद भालेराव यांच्या हस्ते करण्यात आला .
या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रति महिना दहा हजार पाठ्यवृत्ती मिळणार आहे . त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या संशोधन विषयाला आयआयटीने मान्यता दिली आहे . या विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधनकार्य डिसेंबर २०१८ ते जून २०१९ या कालावधीत पूर्ण करावयाचे आहे . या विद्यार्थ्यांना प्रा . पंकज गुप्ता ,प्रा . मनसा बेहेरा ,प्रा . रश्मी गुप्ता ,प्रा . आनंद राव यांनी मार्गदर्शन केले .
‘ तंत्र शिक्षणामध्ये शिक्षणाबरोबर संशोधनाचेही महत्व आहे . अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनविषयक कौशल्य आणि दृष्टिकोन तयार करण्यासाठी या इंटर्नशिप चा उपयोग होईल . विद्यार्थ्यांची प्रतिभा फुलून येईल आणि नाविन्यपूर्ण कल्पनाना वाव मिळेल यासाठी पोषक वातावरण तयार करणे यासाठी महत्वाचे ठरते ‘ असे उदगार डॉ . आनंद भालेराव यांनी या सत्कार प्रसंगी बोलताना काढले
‘संशोधनासाठी संधी मिळणे हे आमचे स्वप्न होते ,उत्तम संशोधन करून आम्ही संधीचे सोने करू ‘ अशा भावना या विद्यार्थ्यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या