पुणे :
‘स्वच्छ भारत अभियान’च्या तिसऱ्या वर्धापनदिना निमित्त गोऱ्हे बुद्रुक, ता. हवेली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी ‘
स्वच्छता
ही सेवा’ या अभियानास प्रारंभ झाला. हे अभियान १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच सचिन पासलकर यांनी दिली.
या अभियानात स्वच्छ शाळा, शौचालयाचा वापर जनजागृती,
स्वच्छता दिंडी, प्रभात फेरी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी सरपंच सचिन पासलकर (गोऱ्हे बुद्रुक, ता. हवेली), नीलेश इनामदार (एन्व्हायर्नमेंट क्लब ऑफ इंडिया), ललित राठी (जन आधार), खुशाल करंजावणे (सामाजिक कार्यकर्ते), एस. जी. खैरनार (ग्रामसेवक), लहु खिरीड (ग्रामपंचायत सदस्य), कुंडलिक खिरीड, सुशांत खिरीड, सतीश पवार, सुजाता काशिद, श्री. बियाणी, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या अभियानात गावातील सर्व घरातील प्लस्टिक कचरा गोळा करण्यात येणार आहे. व पहिल्या टप्प्यात तो सागर संकुल प्रकल्पाला पुनर्वापरासाठी देण्यात येणार आहे. तसेच या पुढील १५ दिवसांच्या अभियानामध्ये ग्रामस्थांना आपल्या घरातील प्लास्टिक कचरा जमा करून साठवणूक करण्याचा संदेश देण्यात येणार आहे.
या अभियानाची सुरुवात गोऱ्हे बुद्रुक गावापासून झाली असून, अशा प्रकारचे अभियान सागर संकुल प्रकल्पांतर्गत अनेक गावात राबविण्यात येणार आहे.