प्रथम राष्ट्रीय पर्यावरण साहित्य संमेलनात पर्यावरणप्रेमींचा सत्कार
पुणे :
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि तेजस्विनी संस्था यांच्या वतीने पर्यावरण साहित्य संमेलन
२०१७ चे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात पर्यावरण संवर्धनाच्या विविध कामात कार्यरत असलेल्या
रवींद्र धारिया (वनराई), नीलेश इनामदार (एन्व्हायर्नमेंट क्लब ऑफ इंडिया)
या पर्यावरण रक्षकांचा डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पर्यावरण मित्र पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला.
विनोद बोधनकर (जलबिरादरी), ललीत राठी (जन आधार) यांच्या हस्ते
हा सत्कार समारंभ बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवारी
झाला. संमेलनाचे हे प्रथम वर्ष होते.
कार्यक्रमाचे संयोजन संजय काळभोर (तेजस्विनी संस्था) यांनी केले. शामला देसाई समन्वयक होत्या.