आंबेडकर -गांधी यांच्यात वैमनस्य नव्हते :तुषार गांधी
पुणे :’ बापू आणि बाबासाहेब यांच्या विचारात वैमनस्य नाही ,दोघांच्या डोळ्यासमोर मागास जनतेच्या पुनरुत्थानाचाच विचार होता ,दोघांच्यात वैमनस्य असते तर संविधानाच्या निर्मितीसाठी महात्मा गांधींनी बाबासाहेबांची निवड केली नसती आणि बाबासाहेबांच्या मनात द्वेष असता तर गांधींच्या प्रस्तावाचा स्वीकार केला नसता ‘असे ठाम प्रतिपादन महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी येथे केले .
ज्या शक्तींनी बापूना मारले आणि बाबासाहेबांना बाजूला केले ,सध्या त्याच शक्ती आंबेडकरांच्या नावात आतापर्यंत नसलेला राम जोडत आहेत . त्यांच्या मनातील डाव ओळखून त्यावर मात केली पाहिजे . बापूंचा राष्ट्रविचार आणि बाबासाहेबांच्या संविधान विचाराला याच शक्ती चूड लावू पाहत आहेत . लोकशाही व्यवस्स्था,न्यायालये खिळखिळी करण्याचे काम चालू आहे . त्यामुळे राष्ट्राचे अस्तित्व राहील की नाही ,कि नव्या व्यवस्थेचे आपण गुलाम होऊ ,याची काळजी आहे . पुढील काळात आंबेडकर जयंती साजरी करता येईल कि नाही याचीही काळजी वाटत आहे ,असेही ते म्हणाले .
घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ;क्रांतीज्योती ‘संस्था आयोजित ”वैचारिक भीमजयंती ‘ कार्यक्रमात तुषार गांधी बोलत होते . अन्वर राजन ,डॉ सिद्धार्थ धेंडे ,एड . वैशाली चांदणे ,डॉ . अमोल देवळेकर ,उमेश चव्हाण,विठ्ठल गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते .
जिल्हाधिकारी कार्यलयासमोरील बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यानात हा कार्यक्रम शुक्रवारी रात्री ९ वाजता झाला . तुषार गांधी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला .
तुषार गांधी म्हणाले ,’जात ,धर्म ,प्रदेश ,लिंग अशा विघटनवादी घटकांमध्ये आपण विभागले गेलो आहोत . अशातच गांधी विचार आणि आंबेडकरवादी विचार वेगळे असल्याची आवई उठवली जाते . त्यात तथ्य नाही . दोघांच्या डोळ्यासमोर या राष्ट्राच्या कल्याणाचा आणि सामान्य जनतेच्या पुनरुत्थानाच्या विचार होता .
लोकशाही व्यवस्स्था,न्यायालये खिळखिळी करण्याचे काम चालू आहे . त्यामुळे राष्ट्राचे अस्तित्व राहील की नाही ,कि नव्या व्यवस्थेचे आपण गुलाम होऊ ,याची काळजी आहे . पुढील काळात आंबेडकर जयंती साजरी करता येईल कि नाही याचीही काळजी वाटत आहे
अशावेळी विघटनवादी विचारांवर मात करण्यासाठी सर्व समविचारी व्यक्ती ,संस्थांनी एकत्र येऊन क्रांतीचा लढा दिला पाहिजे
वैशाली चांदणे यांनी प्रास्ताविक केले . डॉ अमोल देवळेकर यांनी सूत्रसंचालन केले .