नवी दिल्ली(विशेष प्रतिनिधी )-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उत्तम प्रशासकीय कारभार हाकू शकतात पण विरोधी पक्षांना शह देण्यासाठी उत्तम राजकारणी होऊ शकत नाहीत पक्षश्रेष्ठींनी हे जाणले असून त्यांच्या युवा वर्गाला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने जर विचार केला तर पुणे लोकसभा मतदार संघातून अरविंद शिंदे यांच्या नावाचा विचार प्राधान्याने होऊ शकतो ,आणि जर शहर अध्यक्षांनी शिंदे यांच्याकडे लोकसभा लढविण्यासाठी आवश्यक बळ असल्याची ग्वाही दिली तर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो ,दरम्यान कॉंग्रेस ने राज्यसभा सदस्य संजय काकडे यांच्या साठी दरवाजे उघडे ठेवले आहेत . कॉंग्रेस मध्ये पक्ष श्रेष्ठींच्या दालनात सध्या या दोन नावावर पुणे अडकून आहे .
दिल्लीतील कॉंग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी याबाबत ‘मायमराठी’ ने प्रत्यक्ष संपर्क साधल्यावर हि माहिती दिली . आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर या सूत्रांनी हे देखील सांगितले कि ,गेल्या लोकसभेला उषा काकडे यांना उमेदवारी देण्याचा विचार करण्यात आला होता . पण तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण यांनी आपल्या नीतिमत्तेच्या राजकारणात त्यापेक्षा विश्वजित कदम यांच्या नावाला प्राधान्य दिले आणि पक्षश्रेष्ठींनी तात्काळ मंजुरी देखील दिली .पण आता बराच अस्तित्वात असलेला राजकीय प्रवाह आणि धोरणे नितीमत्ता यांची सांगड घालून श्रेष्ठी उमेदवाराचे नाव ठरवतील . आक्रमक युवा म्हणून ते शिंदे यांच्या नावाला पसंती देतील मात्र त्याबरोबर लोकसभा लढविण्याची ताकद राजनीती त्यांच्याकडे आहे काय हे पाहिले जाईल .मोहन जोशी हे निष्ठावंत आहेत ,त्यांनी पूर्वी निवडणूक लढविली आहे. वारंवार कुठे ना कुठे त्यांना संधी देखील दिली आहे .अन्य उमेदवारात शिवरकर आणि अभय छाजेड यांची हि नावे आहेत ,मात्र हि नावे पिछाडीवर आहेत .लोकसभेसाठी जेवढी चुरस पुण्यातून असायला हवी तेवढी नाही हे देखील सूत्रांनी काबुल केले . कलमाडींचा झंजावात निर्माण करणारा नेता श्रेष्ठींना देखील हवा आहे पण कलमाडींना पुन्हा उमेदवारी देण्यावर विचार होऊ शकत नाही .त्यांनी केलेल्या गैरबाबीमुळे ते शक्य नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले .