पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने सातशे एकरवर उभारल्या जाणाऱ्या महाळुंगे हायटेक
सिटीमध्ये विकसित केल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा विकास कामांकरिता भूधारकांसमवेत पुणे, बालेवाडी मिटकॉन येथे दि.१६ऑक्टोबरला मंगळवारी सकाळी १०.०० वाजता कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेला मा. महानगर आयुक्त किरण गित्ते, महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, सहायक संचालक धनंजय खोत,उपजिल्हाधिकारी सुहास मापारी, महाळुंगेचे सरपंच मयूर भांडे, नगरसेवक बाबुराव चांदेरे, ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळेकर,वरिष्ठ अभियंता अमित तिडके तसेच एसबीआय व आयसीसीआय बँकेचे प्रतिनिधी आदी कर्मचारी उपस्थित होते.
सुहास मापारी यांनी उपस्थितांना सांगितले की, ‘महाळुंगे नगररचना योजनेत ग्रामस्थांचा सिहांचा वाटा आहे. ५० टक्क्के परतावा यामाध्यमातून ग्रामस्थांना दिला जात आहे. चार ते पाच वर्षात टीपी स्कीमच्या महाळुंगे माणचा कायापालट झालेला दिसेल.’
महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून ‘महाळुंगे हायटेक सिटीमध्ये पायाभूत सुविधा निर्माण
करण्यासाठी पीएमआरडीए सुमारे ६०० कोटी रुपये गुंतवणूकीच्या माध्यमातून विकास साधणार असल्याचे सांगितले. या भागात१२ मीटर ते ३६ मीटर रुंदीचे रस्ते, पाणी पुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, वीज पुरवठा व विविध नागरी सुविधांचा समावेशआहे. या भागात समाविष्ट टीपीस्कीम मधील भूधारकांना ४ एफएसआय मोबदला मिळणार असल्याचे सांगितले. हिंजवडी आयटीपार्कला जोडून महाळुंगे नगररचना असल्याने यामाध्यमातून खासगी व परदेशी गुंतवणूकदार या भागात आकर्षित होण्यास मदतहोईल.
लवादाची नियुक्ती झाल्यामुळे बऱ्याच अडचणी दूर होऊन सात ते आठ महिन्यात टीपी स्कीमचे प्रॉपर्टी कार्ड भूधारकांच्या नावे केलीजातील. संपूर्ण क्षेत्राचे झोननिहाय ९ भागात वर्गीकरण केले आहे. सर्व भूखंडाचे चिन्हांकान केले असून खांब रोवणीचे काम चालू आहे.
मागील एक वर्षात गावकऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देउन पुढील प्रक्रियेत सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहनकरण्यात आले.
पीएमआरडीएमध्ये भूधारकांसाठी मोफत सल्ला केंद्र
महाळुंगे माण नगररचना योजना क्रमांक १ मधील जमीन धारकांना आपल्या भूखंडाचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी
पीएमआरडीएमध्ये मदत कक्ष सुरु करण्यात येणार आहे. याद्वारे दर आठवड्याला कायदेशीर सल्ला, वास्तूविशारद सल्ला, व बँकअधिकाऱ्याचा सल्ला प्रत्येकी २ दिवस देण्यात येईल. यामुळे जमीन धारकांची फसवणूक टाळली जाईल. व आपले नियोजन करण्यास अचूकपणे मदत होईल.