निलंबित कामगारांची बाजू ऐकणार कोण ?
पुणे- कुठलाही निर्णय घेताना तो एकतर्फी नसावा, किंवा चूक झालेली असेल तरी कोणत्या परिस्थितीत चूक झाली याचा हि विचार आवश्यक असतो …केवळ संस्थेचा फायदा म्हणून लोकहिताला -कामगार हिताला गळफास देऊन चालणार नाही . तुकाराम मुंडे यांनी घेतलेला निर्णय प्रशासनासाठी योग्य असूही शकेल .. तो कामगार विरोधी तर नाही ? मानवता विरोधी तर नाही ? याचा विचार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला करावाच लागेल .आणि प्रशासन आणि कामगारांची बाजू ऐकून घेवूनच निलंबित कामगारांबाबत योग्य तो निर्णय घेतला गेला पाहिजे अशी माझी ठाम भमिका असल्याचे महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष म्र्लीधर मोहोळ यांनी म्हटले आहे .
पीएमपीएमएल मधील १५८ कामगारांच्या निलंबनाबाबत मंडे यांची बदली झाल्यावर आक्षेप घेणारी वक्तव्ये काही मंडळी करीत आहेत . याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिले . कामगारांची बाजू ऐकून घेण्यात गैर काय ? परिस्थिती समजून घेण्यात अडचण काय ? कोणी जाणून बुजून , अमिषाला बळी पडून चूक केली तर शासन जरूर व्हावे .. याच भूमिकेतून मुंडे यांनी केलेल्या निलंबनविषयक कारवाईचा फेरविचार करावा असे मला वाटते …चांगल्या कामगारांनादेखील कोणी वाली उरला नाही असे होता कामा नये ..असे हि त्यांनी स्पष्ट केले .. पहा आणि ऐका नेमके मोहोळ यांनी काय म्हटले आहे .