पुणे-राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने ‘भाजपचे गुंड ‘असा उल्लेख करताच त्याचे वाक्य पूर्ण न होऊ देता महापालिका सभागृहात जो गोंधळ उडाला आणि या गोंधळातच भाजपच्या आणखी तरुणाने विरोधीपक्षनेते यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या संशयाने काही मिनिटे सभागृहात वातावरण तप्त झाले होते. राजकीय गोंधळाला वैमनस्याचे स्वरूप येते कि काय ? अशी शंका येण्याजोगी परिस्थिती बिघडली .अरविंद शिंदे, श्रीनाथ भिमाले, गोपाळ चिंतल ,मुरलीधर मोहोळ, प्रशांत जगताप ,अविनाश बागवे आदींनी अखेर उडू पाहणाऱ्या भडक्यावर पाणी शिंपडून या तप्त वातावरणाची अखेर केली … नेमके काय झाले ? विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांना कोण काय म्हणाले ? असे प्रश्न या वातावरणात निर्माण झाले होते .
महापालिकेची मुख्यसभा आज वसूबारस असूनही सुरु झाली होती. सुरुवातीलाच राष्ट्रवादी सह कॉंग्रेस, भाजपा, सेना साऱ्यांचाच एकमताने ज्या प्रश्नावर आक्षेप होता ..तो प्रश्न म्हणजे .. सुमारे ४० कोटीहून अधिक थकबाकी असूनही मोबाईल कंपन्यांच्या टॉवरला , त्यासाठी रस्ते खोदाईला प्रशासन का मान्यता देते ?यावर सुरुवातीला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाने आंदोलन केले . आणि नंतर आपल्या जागेवर सभासद जावून बसले…. याच प्रश्नावर चर्चा चालू असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक महेंद्र पठारे महापौरांच्या परवानगीने बोलायला उभे राहिले . .. माझ्या भागात रिलायन्सचे अधिकारी आणि एक भाजपचा गुंड पोलीस संरक्षणात ….. एवढेच वाक्य त्यांचे अर्धवट झाले आणि … भाजपच्या नगरसेवकांनी त्यास आक्षेप घेतला. पठारेंना माफी मागायला लावा अशी मागणी श्रीनाथ भिमाले आणि गोपाळ चिंतल यांच्यासह अनेकांनी केली . यावर राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि विपक्षनेते पठारे यांच्याकडे जावून त्यांना याबाबत विचारणा करत असताना कॉंग्रेसच्या अरविंद शिंदे यांनी … शब्द कामकाजातून वगळून टाका महापौर .. अशी सूचना केली . पण पुढे गोंधळ वाढतच गेला … आणि या गोंधळात कोणी ? कोणाला ? अपशब्द वापरले आणि पुढे सुरु झाले वाकयुद्ध …घोषणाबाजी .. लठ्ठालठ्ठी … विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील प्रथमच एवढे सभागृहात संतापलेले दिसले .. आणि त्यांचा यावेळी प्रतिस्पर्धी जाणवत होता तो .. एक तरुण नगरसेवक .. भाजपचे दीपक पोटे.. ही बाब लक्षात येताच .. भिमाले , मोहोळ, अरविंद शिंदे ,गोपाळ चिंतल अविनाश बागवे आणि प्रशांत जगताप यांनी हा सारा प्रकार सभागृहात तरी यशस्वीपणे थांबविला … त्यानंतर काही वेळाने थकबाकीदार असलेल्या मोबाईल कंपन्यांच्या खोदाईला विरोध करणाऱ्या आपल्या भाषणातही या प्रसंगाचा उल्लेख केल्यावाचून बाबुराव चांदेरे ,सुभाष जगताप यांना राहवले नाही . पहा ही वसू बारस दिनी झालेली महापालिकेची मुख्यसभा .