पुणे- पुणे तिथे काय उणे , या उक्तीप्रमाणे सोवळे प्रकरणाने अजूनही आहे जुने ..शहर आमचे पुणे .. चा प्रत्यय आणून दिला ..पण आता याच सोवळे प्रकरणाने महापालिकेच्या मुख्यसभेत हि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात अॅडजेस्टेबल कामकाज होऊ शकते ..याचा प्रत्यय आणून दिला आहे . यास कोणी सामंजस्यदायी भूमिका असेही नाव देवू शकेल. पण या निमित्ताने का होईनात , विरोधक सत्ताधाऱ्यांशी मिळते जुळते घेण्याच्या मनस्थितीत असू शकतात हे मात्र स्पष्ट झाले आहे .
हे सारे कसे घडले पहा, पहिली मुख्यसभा सप्टेंबर कार्यपत्रिकेची होती . सभा सुरु झाली तेव्हा माजी महापौर दिवाकर जयसिंग खिलारे, आणि आदी मान्यवरांच्या निधनामुळे त्यांना श्रद्धांजली वाहून हि सभा तहकूब करण्यात आली. दुसरी सभा, खास सभा होती , या वेळी अरविंद शिंदे ,अविनाश साळवे , अविनाश बागवे, संजय भोसले,दिलीप बराटे यांनी ‘सोळवे’ प्रकरणातील खोले यांच्या चुकीच्या कृत्याचा निषेध करणारी तहकुबी मांडली, या वेळी कित्येक वेळ सभागृहात शांतपणे .. कामकाज ठप्प झालेले होते . मध्ये कोणी तरी म्हटले.. तुम्ही तहकुबी मांडा , अन्यथा ९६ आकडा काढून टाका … पण अशा टिप्पणीला सत्ताधाऱ्यांकडून दाद मिळाली नाही ,आणि ही तहकुबी संमत करू पण त्यावर कोणी बोलायचे नाही, भाषणे करायची नाही ,अशी अट सत्ताधाऱ्यांकडून घातली गेली. आणि एकमताने ती मान्य करून तहकुबी मांडली गेली. मात्र तहकुबीतले काही शब्द देखील आयत्यावेळेला महापौरांनी वगळले … पहा याचा खास व्हिडीओ रिपोर्ट.. प्रत्येकाच्या याबाबतच्या मतासह….