पुणे- सुशोभीकरणाच्या नावान धनकवडी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकाचा वर्तुळाचा परिसर अरुंद केला जात असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते आहे . एवढेच नव्हे तर मागणी नसताना आणि आवश्यक्यता नसताना येथील लोकबैठकी साठी असलेल्या पायऱ्यांंच्या पुढ्यात सायकल मार्ग आणि हिरवळीचा पट्टा तयर करून पुढील वाहतुकीचा रस्ता अरुंद केला जात असल्याचे स्पष्ट दिसते आहे . या बाबींकडे अद्याप कोणाचे लक्ष गेलेले नसले तरी येथील स्वीकृत नगरसेवक आणि या चौकाचे शिल्पकार म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्या सुभाष जगताप यांनी मात्र ..या प्रकरणी ‘मायमराठी ‘ने विचारणा केल्यानंतर ताशेरे ओढले आहेत .सगळीकडे रस्त्यांचे रुंदीकरण होत असताना या ठिकाणी अशा प्रकारे चौकाची जागा अरुंद करणे म्हणजे निव्वळ उधळपट्टी करणे आहे . काही तरी करण्या ऐवजी आहे,होते तेच चौकाचे वैभव टिकवले असते तरी पुरे झाले असते असा टोमणा मारत त्यांनी या चौकाची विद्यमान नगरसेवकांनी दुर्दशा करून आता उधळपट्टी सुरु केल्याचा आरोप केला आहे.
धनकवडी गावातून तळजाई वरून येणारा रस्ता ,गुलाबनगर हून येणारा आणि सातारा रस्त्यावरून अहिल्यादेवी येथून येणारा रस्ता आणि पद्मावती हून येणारा रस्ता या चौकात वाहतूक सुरळीत करू शकतो एवढा मोठा हा चौक आहे.पण रात्रीच्या वेळी केवळ काही वाहने येथे लागतात या निमित्ताने महापालिकेने येथे हा सुशोभीकरणाचा घाट घातला आणि सुशोभीकरणासाठी चारही बाजूने असलेले आयलंड्स थोडे थोडे पुढे सरकवून चौकातील वाहतुकीची जागा कमी करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे सध्याचे काम पाहता लक्षात येते . काही दिवसापूर्वीच शनी मंदिरासमोरील गणपतीचे मंदिर महापालिकेने मध्यरात्रीनंतर पाडले .ते वाहतुकीस अडथला करणारे होते आणि बेकायदा होते असे कारण त्यासाठी दिलेले आहे .तेथून काही फुट अंतरावरच हा चौक आहे . या चौकात ५० लाख रुपये खर्च करून सुशोभीकरणाचे काम हातही घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे नेमके येथे काय कारणार कसे सुशोभिकरण करणार? हे सांगणारा तसेच महापालिका नियमानुसार कामाची माहिती देणारा फलक देखील येथे न लावता काम सुरु करण्यात आलेले आहे.
हे काम कोण करतंय,कधी पूर्ण होणार आहे याबाबत कोणतीही माहिती येथील नागरिकांना नाही .एवढेच नव्हे तर नेमके काय करणार आहे ,याबाबत नागरिकांना विश्वासात घ्यायला हवे होते असे लोकांचे म्हणणे आहे. चौकापासून पुण्याकडे आणि सातारा रोड कडे तसेच गुलाब नगर कडे जाणारे तिन्ही मार्ग नेहमीच वाहतुकीच्या कोंडीने त्रस्त असतात. आता चौकाची प्रत्यक्षात वाहतुकीसाठी असलेली रुंदी जागा ..कमी झाली तर हा चौक देखील वाहतुकीच्या कोंडीत गुदमरल्या शिवाय राहणार नाही . त्यामुळे येथे विनाकारण सुशोभीकरणाचा खर्च न करता आहे तो चौक स्वच्छ आणि प्रकाशमान असा ठेवावा त्याचे कारंजे उन्हाळ्यात आणि आवश्यक त्या वेळी सुरु ठेवावेत एवढे जरी महापालिकेने सांभाळले तरी या चौकाचे गेलेलं वैभव पुन्हा दिसू लागेल असे लोकांचे म्हणे आहे . पहा यावर एक व्हिडीओ रिपोर्ट …