पुणे- महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची अवघ्या आठ महिन्यातच येथून बदली करून शासनाने त्यांना उस्मानाबाद च्या जिल्हाधीकारीपदाची सूत्रे हाथी घेण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे . निंबाळकर यांनी या बदलीच्या वृत्तास दुजोरा दिलेला नसला तरी या वृत्ताने महापालिकेच्या राजकीय आणि तमाम शासकीय, निमशासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तुळात बदल्यांच्या राजकारणाबाबत एकच चर्चा उसळली आहे .
राज्यात वादग्रस्त म्हणून सर्व आणि सुपरिचित असलेल्या तुकाराम मुंडेंची 11 वर्षात 12 वी बदली झाली असे म्हणतात , मुंडेंनी नेमके काय काम साधले, केले … आपल्या आजवरच्या कारकिर्दीत मुंडेंनी कोणते यश संपादन केले ? यावर मंथने होतील … पण त्यांचा कायम जाईल तिथे लोकप्रतिनिधींशी वाद होत गेला ,आणि कोणतेही ठोस काम न करता उभी कारकीर्द वाया जाते कि काय अशी स्थिती असताना ..त्यांच्या बदल्यांचे समर्थन ना शासन, ना मुंडे करू शकतात अशी स्थिती निर्माण झाली. .
आय ए एस अधिकारी आहोत, शासन पाठवेल तिथे जाऊ, तिथे ठेवेल तोवर ,जे करता येईल ते काम करू , हि भूमिका बहुतेक अधिकाऱ्यांची असतेच असते. वाद्ग्रस्तांची बदली होतेच होते , पण ‘ गाॅड फादर ‘ करवून काम करण्याची मानसिकता नसलेल्यांना हि या बदल्यांचा सामना करावा लागतो अशी अवस्था राज्यात असावी अशी स्थिती हि आता दिसून येते आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही .
राजेंद्र निंबाळकर सध्या पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत . गेल्या मार्च 2018 मध्ये त्यांची येथे नियुक्ती झालेली आहे . खरे तर तीन वर्षाचा कालावधी आधिकाऱ्यांना द्यायला हवा ,पण किमान दोन वर्षाचा असेल तरी काहींना आवश्यक, कामासाठी पुरेसा भासतो.निंबाळकरांची अवघ्या 8 महिन्यात पुणे महापालिकेतून बदली होणे खरे तर खूपच आश्चर्यकारक आहे .इथे सध्या तीन अतिरिक्त आयुक्त आहेत . महापालिकेच्या सध्या तिघांमध्ये जुन्या असलेल्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्याबाबत राज्य शासनाकडे सातत्याने लोकप्रतिनिधी तक्रारी करत आहेत .त्यांच्या बदलीसाठी मोर्चा झाला, शिष्टमंडळेगेली. पण याबाबत लोकप्रतिनिधींचे सारे प्रयत्न अपयशी ठरले. अखेर महिन्यापूर्वीच इथले तिसरे रिक्त असलेले अतिरिक्त आयुक्तपद शासनाने भरले आहे आणि इथे विपिन शर्मा नावाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे.त्यांनी अजून नित कारभार हातही घेतला ना घेतला तोच ,अशा स्थितीत ज्यांच्याबाबत अजिबात तक्रार नाही, त्यांची बदली, म्हणजे मोठा धक्का मानला जातो आहे.
राजेंद्र निंबाळकर यांचा गेल्या साडेतीन वर्षातला बदलीचा इतिहास मोठ्ठा रंजक आहे . ना कुठे ते वादग्रस्त झाले , ना कुठे त्यांचा विशिष्ट एकाच राजकीय पक्षाशी ,ना लोकप्रतिनिधींशी वाद झाला . पूर्वी पुण्यात म्हाडा वर ,तत्पूर्वी पुणे महापालिका आयातकर प्रमुख अशा पदावर काम केलेले निंबाळकर अत्यंत शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून ओळखले जातात .कोणताही एखादा राजकीय पक्ष,नेता,गट त्यांच्या बाजूने आहे किंवा विरोधात आहे अशी स्थिती नाही .
गेल्या जून २०१५ रोजी त्यांची भंडारा येथे नियुक्ती झाली भंडारा येथे शिक्षण क्षेत्रात त्यांनी लक्ष घातले तेव्हा 25 /२५ वर्षे शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत ,हेपाहून त्यांनी बदल्या सुरु केल्या आणि निविदा प्रकरणात नियम अमंलबजावनी साठी कठोर निर्णय घेतले यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव आला आणि .त्यानंतर ऑगस्ट २०१६ नागपूर येथे बदली करण्यात आली .नागपूर नंतर सप्टेंबर २०१६ रोजी उल्हासनगर येथे बदली झाली मार्च २०१७ ला त्यांना पनवेल ला पाठविण्यात आले . तेव्हा उल्हास नगर मध्ये त्यांच्या बदली विरोधात जन आंदोलन झाले .आणि जून 17 ला त्यांना पुन्हा उल्हासनगर येथे पाठविण्यात आले .आणि त्यानंतर मार्च 2018 ला त्यांची बदली पुण्यात झाली .म्हणजे साडेतीन वर्षात सहा बदल्या झाल्या . आता त्यांची बदली उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आल्याचे वृत्त आहे . या बदलीच्या वृत्ताने महापालिका प्रशासन आणि राजकीय वर्तुळातील अनेकांनाआश्चर्याचा धक्का बसला आहे .’असा यांनी काय केला गुन्हा ‘याचा उलगडा अनेकांना होईनासा झाला आहे. आता हा प्रश्न निंबाळकर हे स्वतःच शासनाला विचारतील काय ? असा सवाल हि महापालिका वर्तुळातून उपस्थित होतो आहे.