पुणे-जिल्हाधिकारी पदावरून आज महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार तर आज सौरभ राव यांनी स्वीकारला…आता बेरोजगारांचे आणि विविध प्रश्नांच्या माध्यमातून तमाम पुणेकरांचे लक्ष याच आयुक्तांच्या भूमिकेकडे लागून राहणार आहे .
मागच्या आयुक्तांनी दुर्लक्षित केलेल्या आणि वाऱ्यावर सोडून दिलेल्या महापालिकेतील बोगस कामगारांचे… आता नवे आयुक्त सौरभ राव ..काय करणार ? या कडे लक्ष लागून रहाणार आहे . थेट पालिकेच्या मुख्य सभागृहापर्यंत वावरणाऱ्या बोगस कामगारांचा प्रश्न आणि त्यामागे लपलेले राजकीय; प्रशासकीय मुखवटे नवे आयुक्त खेचून काढतिला काय ? कि पुन्हा जुन्या अधिकाऱ्यांप्रमाणे ;दुर्लक्ष’ करत रहातील ? .. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देणार आहे .
महापालिकेत सत्ताबदल झाल्यावर तब्बल ७२ बोगस कामगार महापालिकेच्या मुख्य भवनात काम करत असल्याचे ‘मायमराठी ‘ ने वारंवार जाहीरपणे निदर्शनास आणून दिले . एवढेच नव्हे तर मिळकत कर खात्यात ‘सुराणा’ नामक एकाला रंगेहाथ पकडून दिले.तेव्हा तत्कालीन अधिकारी सुहास मापारी यांनी आदेश देऊन त्याचेवर गुन्हा दाखल केला . पण त्यानंतर ७२ कर्मचाऱ्यांची नावे प्रसिद्ध करूनही आणि त्यातील एकाला भूमी जिंदगी विभागात रंगेहाथ पकडून देवूनही संबधित जुन्या अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई न करता ‘मौनी बाबा’ होणे पसंत करत कारभाराला पाठीशी घालण्याचा प्रकार राबविला . आता नवे आयुक्त आले आहेत . त्यांच्यापुढे महापालिका भवनातील ७२ बोगस कामगारांचा प्रश्न आहेच . या सर्वांना एक तर अधिकृत म्हणून रीतसर पद्धतीने कामावर तरी घ्या .. अन्यथा त्यांच्या शिवाय कारभार चालवा … असे सांगूनही प्रश्न सुटलेला नाही . अवघ्या 6 ते 9 हजार रुपये पगारावर तरुणाईला राबवून घेवून ,कामगार कायदे धाब्यावर बसविणाऱ्या ‘महाभागांचा ‘ पर्दाफाश करणार कोण ? हा प्रश्न अजूनही कायम आहे .सौरभ राव हे पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावरून महापालिकेच्या आयुक्तपदावर आले आहेत . त्यांना पुण्याच्या वाहतूक समस्येसह सर्व समस्या आणि राजकारणी तसेच अधिकारी ही परिचित आहेतच .
पण प्रामुख्याने चांदणी चौकातील शिवसृष्टी,शहरातील सायकल ट्रेक , पे अँड पार्किंग, २४ तास पाणीपुरवठा , नळाला मीटर जोडणे , कचरा समस्या,कात्रज कोंढवा रस्त्याचे भूसंपादन अशा अनेक प्रश्नांवर देखील नव्या आयुक्तांना ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.येत्या काळात ते या सर्व प्रश्नांना कसे सामोरे जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .