पुणे- कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षांशी लढत करायची तेव्हा करतील ..पण भाजपच्या नवीन नगरसेवकांवर ,किंवा सरळमार्गी चालू पाहणाऱ्या नगरसेवकांवर सध्या तरी खरा सामना प्रशासनाबरोबरच करण्यात जास्त वेळ घालवावा लागतो आहे . याची अनेक उदाहरणे महापालिकेत देता येतील . त्यातील एक येथे देत आहोत , बालेवाडी येथील पाण्याच्या टाकीचे …
भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बालेवाडी गाव मुख्य चौकात जिल्हा परिषदने सुमारे ३० वर्षांपूर्वी बांधलेली पाण्याची टाकी अत्यंत धोकादायक स्थितीत होती व या ठिकाणी बाजूला नवीन टाकीचे बांधकाम झाल्याने हि टाकी वापरात हि नव्हती. या टाकीखाली गावातील अनेक वृद्ध व्यक्ती व महिला बसत आल्याने या टाकी पडण्याचा धोका अधिक वाटतो म्हणून .
हि टाकी पाडण्यासाठी पाणी पुरवठा विभाग व भवन विभागाला ३.दि.५ मे २०१७ रोजी आणि दि.१७ मे २०१७ रोजी पत्राद्वारे कळविले.पत्र दिल्यानंतर ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून देखील संबंधित विभागाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने नगसेवक अमोल बालवडकर यांनी म.न.पा.मुख्य सभेत याबाबत आवाज उठविला आणि १ महिन्यांच्या आत हि टाकी पडण्याचे आश्वासन मिळविले , पण पुढे पुन्हा सुरु झाला .. हे आश्वासन पाळा म्हणून पुन्हा पाठपुराव्याचा प्रवास ..अखेर १ महिन्यानंतर पाणी पुरवठा विभागाकडून हि टाकी पाडण्यात आली. परंतु पाडलेल्या टाकीचा राडारोडा न उचलता जागेवरच सोडण्यात आला.आता तो उचलावा म्हणून अमोल बालवडकर गेली १ महिना पाठपुरावा करत आहेत …
आणि यातच त्यांची आमची भेट झाली ..
आणि म्हणाले ,’एका छोट्या कामासाठी एवढा पाठपुरावा करूनही एवढी टाळाटाळ करणारे पुणे म.न.पा.चे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अत्यंत मुजोर व कामचुकार आहेत
पुणे शहरात भा.ज.प.सत्ताधाऱ्यांना विरोधकांपेक्षा अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांकडून जास्त धोका आहे .
……… बालवडकरांची हि एकट्याची व्यथा निश्चित नाही , पण एकीकडे अधिकाऱ्यांना धमकावून , त्यांना लाथा घालून कामे करवून घेणारे च नाही तर बेकायदा कामांवर कारवाई करू नये म्हणून धाक ठेवणारे काही महाभाग नगरसेवक ही याच महापालिकेत आहेत … मग या सर्वांनी असेच महाभाग बनण्याची वाट प्रशासनातील कदाचित काही धेंडं पाहत असावीत असेच अशा घटनांनी दिसून येते .