पुणे-
यापूर्वीच्या काळात लोकसभेत निवडून गेलेला आणि राज्यसभेत निवडून गेलेला खासदार काँग्रेस ने पुण्याचा नेता बनविला होता , राष्ट्रवादीने ही परंपरा खंडित केली असे म्हणता येणार नाही . कारण काहीही केले तरी राष्ट्रवादीचे नेतृत्व हे कायम शरद पवारांकडे राहिले आहे .सुप्रिया सुळे या नेहमीच अजितदादांच्या पक्षांतर्गत स्पर्धक त्यामुळेच मानल्या गेल्या . पण एकूणच कॉंग्रेसच्या नेता देण्याच्या परंपरेला आता इतिहासातच जमा व्हावे लागणार आहे . बॅरीस्टर गाडगीळ यांच्याकडून शरद पवारांनीच कलमाडीला पुढे करून पुण्याचे नेतृत्व बदलले . आता त्याला ही बराच अवधी लोटला आहे . जुने पुणे अल्पमात्र बनले आहे .. आणि पुण्यात बहुजन बहुआयामी .. विविध जातीजामातीचा समाज प्रचंड संख्येने आला आहे . कलमाडीच्या नेतृत्वानंतर अजितदादांचे नेतृत्व महापालिकेला मिळाले , ज्यास अगदी पर्यायाने शहराचे नेतृत्व मानले गेले . पण खऱ्या अर्थाने पुण्याला नेता.. असा याही काळात मिळाला नाही. आता तो गिरीश बापटांच्या रूपाने मिळतो आहे . पुण्यात राहणारा , पुण्याची जाण असणारा हा नेता आहे यात शंका नाही . पण ….
अलीकडेच पक्षात आलेले खासदार संजय काकडे हे आपल्या पक्षातील ‘सुरेश कलमाडी’ अशी जागा स्वतः साठी निर्माण करू शकतात .. हा धोका जेव्हा लक्षात आला तेव्हा ,खासदार अनिल शिरोळे गट हाच केवळ त्यांचा पक्षांतर्गत विरोधक राहिला नाही तर सर्वात मोठे लक्ष्य त्यांना काकडे यांना करावे लागले .
आता इथे दिल्लीश्वर नाही ‘ मुंबईश्वर -नागपूरकर ‘ म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शी असलेल्या चांगल्या संबधामुळे आणि काकडे यांची आपल्याला पुणे महापालिका जिंकायला कोणत्या स्वरूपाची मदत होवू शकते हे ओळखून ‘मुंबईश्वरांनी’ त्यांच्याकडे काही जबाबदारी टाकली होती, हे आता पर्यंत स्पष्ट झाले आहे . . आणि काकडे यांनी उत्साहाने ती स्वीकारताच .. पुणेरी राजकारण ढवळून निघाले .
असंख्य समाजाचे मोर्चे , वाढत्या गुन्हेगारीवर समाजात उमटणाऱ्या तीव्र प्रतिक्रिया , आणि मुख्यमंत्र्यांना खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी सुरु असलेल्या राजकीय चढाया या अवस्थेत .. साम दाम दंड भेद .. मार्गाने निघालेल्या फडणविसांना जणू शह दिला गेला .अर्थात तो स्व अस्तित्वासाठी होता . आणि ‘पुण्याचा कारभारी मीच अशी डरकाळी फोडली गेली . अर्थात हि डरकाळी एका जुन्या जाणत्या निष्ठावान आमदाराची होती पण ती चक्क दोन्ही खासदारांना आव्हान देवून गेली . पर्यायाने हा प्रकार अनेकांना ‘चाणक्यनिती’सारखा भासला . मंत्रीपदावर असलेल्या बापट यांनी पदावर आल्यापासून अनेक टिकांचा सामना हि केला , पण पुण्याच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा हे सारे टीकाकार देखील त्यांच्या बरोबर उभे ठाकले . .हे हि येथे नमूद केले पाहिजे .
दुसरीकडे काही सामन्य कार्यकर्त्याला मात्र .. हा राष्ट्रवादीचा कावेबाजपणा असल्याचा देखील भास होतो आहे . पुण्याचा कारभारी म्हणून बापटांचेच दंड थोपटले जावेत हीच इच्छा राष्ट्रवादीतील राजकारण्यांची होती असेही आता बोलले जावू लागले आहे . असे झाले तर शहराची मध्यवस्ती सोडा पण बहुसंख्य जागांवर आपल्याला लढत सोपी होईल असे त्यांना वाटत असावे . मनसे आणि शिवसेना हे पक्ष बहुजन समाजाच्या मागे नाहीच असा दावा करणाऱ्या या राजकारण्यांना कदाचित यामुळे आनंद देखील झाला असावा असे हीबोलले जाते . एकंदरीत महापालिकेच्या निवडणुका यावेळी खरोखर विकासाच्या मुद्द्यावर होणार कि साम दाम दंड भेद यावर होणार, आणि पुण्याचा नेता नेमका कोण असणार ? या सर्व बाबी येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होतील यात शंका नाही .