इस्लामाबाद- जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध रद्द केले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी आज(बुधवार) राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत भारतासोबत कुटनितीक संबंध आणि द्विपक्षीय व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला.पाकिस्तानच्या खलीज टाईम्स ने यासंदर्भात वृत्त दिले आहे आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या इंस्ताग्राम आकावूंट वर या संदर्भात फोटो सह पोस्त टाकण्यात आली आहे जिचा हवाला खलीज टाईम्स ने दिला आहे .
या शिवाय न्यूज एजेंसी एएफपीनुसार, पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्तानने आपला पुढील राजदूत भारतात न पाठवण्याचे ठरवले आहे. भारतासोबतच्या प्रकरणांना पाहण्यासाठी एक कमेटी तयार करण्यात आली आहे. कलम 370 प्रकरणी पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वीने संसदेचे संयुक्त सत्र बोलवले होते. येथे पाकिस्तानचे खासदार भारताविरुद्ध काळा पट्ट्या बांधून आले होते.
जुलै 2018 ते जानेवारी 2019 दरम्यान व्यापार झाला
पुलवामा हल्ल्यापूर्वी जुलै 2018 पासून जानेवारी 2019 दरम्यान दोन्ही देशांमध्ये 6,230 कोटी रुपयांचा व्यापार झाला होता. जानेवारी-जून 2018 च्या तुलनेत यात 5% वाढ झाली होती. तर, 2018-19 मध्ये दोन्ही देशांमध्ये 18 हजार कोटी रुपयांचा व्यापर झाला होता. हा 2017-18 च्या तुलनेत 1600 कोटी रुपये जास्त होता. यात भारताची पाकिस्तानात निर्यात 80% तर आयात फक्त 20% आहे.
जगाला काश्मीरची माहिती नाहीये
इम्रान म्हणाले होते, “भारत काश्मीरच्या लोकांना मिटवण्याचे ठरवत आहे. तो दहशतवादी ठरवून मुस्लिमांना हद्दपार करण्याची योजना आखत आहे. ही परिस्थिती पाहून परत एकदा पुलवामा होईल असे वाटत आहे. नंतर ते माझ्यावर आरोप लावून एअर स्ट्राइक करतील. आम्ही परत याचे उत्तर देऊत. परत युद्ध होईल. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत युद्ध करू. मी आणि माझा पक्ष जगातील इतर नेत्यांना काश्मीरमध्ये काय होत आहे हे सांगणार आहोत. आम्ही त्यांना सांगू की, भारत सरकार काश्मीरच्या लोकांसोबत आणि अल्पसंख्यांकासोबत काय करत आहे.”