पुणे-सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऑफर दिली गेली आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्वतः चौधरी यांनी सांगितले आहे. दरम्यान, ते निवडणूक लढवण्यास तयार झाले तर भाजपाचे उमेदवार चंद्रकांत पाटलांना कडवे आव्हान देऊ शकतात, अशी पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.विश्वंभर चौधरी यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. .दरम्यान केजरीवाल यांचे सहकारी ,कुमार सप्तर्षी,संजय सोनवणी ,तृप्ती देसाई यांच्या सह कोथरुड मधील साहित्यिक ,कलावंत ,लेखक ,विचारवंत विश्वंभर यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी आप च्या वतीने लढावे असा हि सूर आहे.कॉंग्रेस ,राष्ट्रवादी ,मनसे आणि शिवसेनेत त्यांच्या नावाला पाठींबा देणारी मंडळी दिऊन येत आहेत .आणि कोल्हापूरच्या पाटलांना उमेदवारी दिल्याने दुखावलेली भाजप मधील काही मंडळी त्यांना मदत करण्याची शक्यता दिसते आहे. भाजप मधील अशा राजकारणाचा फायदा अर्थात चौधरी घेतील काय ? हा प्रश्न असला तरी , चांगल्या हेतूसाठी पुढे जाण्यासाठी काही तडजोडी ते स्वीकारणार काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
फेसबूकवरील पोस्टद्वारे त्यांनी सध्यातरी आपला राजकारणात येण्याचा मानस नसल्याचे सांगत याबाबत प्रस्ताव असल्याने जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.विश्वंभर चौधरी यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “कोथरूडमधून स्वाभिमानीच्या तिकिटावर मी लढावं असा प्रस्ताव आमचे मित्र माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज मांडला. सर्वांचे मत विचारून लवकरच कळवतो असे मी त्यांना सांगितले आहे. मन अजून राजकारणात जाण्यास तयार होत नाही. उलट माझ्याऐवजी त्यांची स्वतःची उमेदवारी चांगली राहील असेही त्यांना मी सुचवले आहे.”