आता थेट पंतप्रधानांच्या कानावर जाणार पुण्यातील पाण्याचा ठणठनाट ?(व्हिडीओ)
पुणे- धरणे भरली ,नद्यांना पूर आले ..पण शिवाजीनगर मधील रेव्हेन्यू कॉलनीत आठ ते दहा महिन्यांपासून महापालिकेच्या नळाला पाणीच येईना .. नगरसेवक,महापौर ,आयुक्त सारेच खोटी आश्वासने देताहेत आता आम्ही ..पंतप्रधानांच्या कानात ओरडावे काय ? असा संतप्त सवाल आज महापालिकेत आलेल्या या कॉलनीतील रहिवाश्यांनी माध्यमांपुढे केला आहे. यावेळी सातत्याने खोटी आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींसह आयुक्तांबद्दल देखील संताप व्यक्त केला.
आम्ही सुशिक्षित आहोत, आंदोलने ,शिवीगाळ ,धक्काबुक्की करू शकत नाही ,त्याची शिक्षा आम्हाला मिळते आहे काय ?पाहुण्यांना सांगावे लागते पिण्याचे पाणी बरोबर घेऊन या ,आम्हाला स्वतः साठी बाजारातून पाणी विकत आणावे लागते आणि वापरण्यासाठी अक्षरशःआम्ही पाऊस आला कि पावसाच्या पाण्याने बादल्या अन्य भांडी यात पाणी भरून ठेवीत आहोत .. स्मार्ट म्हणविणाऱ्या..राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळविलेल्या पुणे शहरातील नामांकित भागातील हि अवस्था आहे . विशेष म्हणजे हि मंडळी पाण्याच्या मागणी साठी महापालिकेतआली असता महापौर आणि आयुक्त आपापल्या दालनात वेगवेगळ्या बैठकीत व्यस्त असतात …पुण्याची हि व्यथा ..आणि कथा ऐका आणि पहा … या पुणेकरांच्याच तोंडून ..जशीच्या तशी …