पुणे : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात इसाई (ख्रिश्चन )समाजाचे योगदान नाही असे म्हणणाऱ्या भाजपच्या त्या खासदाराला लाज वाटली पाहिजे , देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कॉंग्रेस पक्षाचे योगदान आहे आणि कॉंग्रेसच्या अध्यक्षा अॅनी बेझंट होत्या त्या ख्रिश्चन समाजाच्या होत्या हे ते विसरले आहेत .असे वक्तव्य आज येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वो असलेले शरद पवार यांनी येथे केले.
पुण्यातील ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील,खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे ,महापालिकेतील विपक्ष नेते चेतन तुपे पाटील ,दत्ता धनकवडे ,विशाल तांबे,गफूर खान ,इक्बाल शेख ,नंदा लोणकर,शिक्षणतज्ञ डॉ पी ए इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
देशात परिस्थिती इतकी खालावली आहे की, कोणी काय घालावं, काय खावं हे सांगितलं जातं आहे. देशाच्या नेतृत्वाला या प्रकारे देशात द्वेष निर्माण करायचा आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
ते म्हणाले,’आज समाजाची स्थिती वेगळी आहे. जिथे बंधुभाव संपतो तिथे द्वेषाचा माहोल तयार होत असून अशा परिस्थितीत देशाची प्रगती संपते. दुर्दैवाने हीच स्थिती आज देशात दिसत आहे. कधी मुस्लिम तर कधी इसाई समाजाच्या व्यक्तीवर हल्ले होतात आणि सांगितलं जातं हे हल्ले करणं हा आमचा अधिकार आहे.
आज मला विचारलं, तुम्हाला फर कॅप घालू का ? त्यावर मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगलेले मौलाना अबुल कलाम आझाद जी टोपी घालायची मला का लाज वाटावी असे उत्तर देत फर कॅप घातली. ज्यांच्या हातात देशाचा नकाशा त्यांना फर कॅप घालण्यात लाज वाटते अशा भाषेत त्यांनी उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ईदच्या कार्यक्रमात न घातलेल्या टोपीचा उल्लेख केला. आजूबाजूच्या देशात फार चांगली स्थिती नाही. अशावेळी द्वेषाचा माहोल पसरणार नाही याची आपण काळजी घेऊ असेही ते म्हणाले.
भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चन समाजाच्या बाबत केलेल्या विधानावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, शेट्टी यांनी बोलताना इसाईंचे योगदान नाही असे म्हटले. त्यांना लाज वाटली पाहिजे ज्यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळच्या स्थापना सदस्या अँनी बेझंट या इसाई होत्या.