पुणे-देशातील लोकसभेच्या निवडणुकीत युवकांचा मतदारांचा मतदार प्रक्रियेत सहभाग वाढला पाहिजे या भावनेने महात्मा फुले वाड्यात दलित अल्पसंख्यांक सेवा प्रतिष्ठान आयोजित मतदार जागृती अभियानाचा समारोप झाला .
पहिले माझे नमन मतदार बंधूला , मतदार भगिनी तरुण आणि तरुणीला मतदार करुनी तू घडवी या देशाला …. , दिवस मतदानाचा सण हा मोठा देशाचा सहभाग प्रगतीचा मार्ग लोकशाहीचा …. , इनती करतो आता हि देशाच्या जनतेला , मतदान करू चला फुलवू या देशाला … असे निवडणूक गीत प्रा . योगेंद्र माने यांनी सादर केले . यावेळी जेष्ठ विधीज्ञ ऍड. राहील मलिक यांच्याहस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले . यावेळी दलित अल्पसंख्यांक सेवा प्रतिष्ठानचे सरचिटणीस इंद्रजित सकट , काशिनाथ गायकवाड , शिवराम तरुण मंडळाचे अध्यक्ष आसिफ हरुण शेख , राजेश गाडे , विकास भांबुरे , सुनिल पवार , किशोर गायकवाड , महेंद्र जगताप , सुरेश यादव , गौतम वानखेडे , , हनूक केदारी , दिव्येश म्हकांळे , कुणाल चंद्रशेखर सकट , राज साळवे , सतीश लांडगे , जितेंद्र जठार , रितेश शेलार , देवी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी जेष्ठ विधीज्ञ ऍड. राहील मलिक यांनी मतदार जागृती अभियानाबाबत सांगितले कि , पीपल्स रिप्रेझेंटीव्ह ऍक्ट १९४९ या कायद्यान्वये आपण प्रतिनिधि निवडून तो संसदेत पाठवतो . यामध्ये निवडणूक घेऊन ज्याला सर्वात जास्त मतदान होऊन निवडून येतो त्याला प्रतिनिधित्व करण्यास मिळते .. निवडणूक आयोग मार्गदर्शनानुसार मतदान प्रक्रिया पार पडली जाते , त्या अनुषंघाने मतदार यादीत फाँर्म ६ प्रमाणे त्यांचे नाव मतदार यादीत येते . त्याचे नाव मतदार यादीत आल्यावर तो मतदारास पात्र ठरतो . मतदार यादीत नाव नोंदविले परंतु मतदार यादीत समजा आले नाही तर त्या मतदाराला ४९ अ प्रमाणे तो चॅलेंज व्होट आपले ओळखपत्र दाखवून करू शकतो .समजा त्याच्या नावावर कोणी डमी मतदान केले असल्यास त्या मतदाराला टेंडर मताद्वारे मतदान करून आपला हक्क बजावू शकतो . त्यामुळे सर्वानी जास्तीत जास्त मतदानकरून लोकशाही बळकट करावी .