पुणे-रियाझ वस्ताद हे देशासाठी व काँग्रेस पक्षासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढले , सर्व धर्मीयांमध्ये त्याचा वावर असायचा , त्यांची कामाची छबी लोकांच्या मनात घर करून गेली . चंदुभाई वस्तादांची तालीमला जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले . त्यांच्या कामाचा वारसा आपण चालवू , अशा शब्दात राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी श्रद्धांजली वाहिली .
पुणे कॅम्प भागात बाबाजान चौकात लेडी हवाबाई शाळेच्या सभागृहात सीरत कमिटीच्यावतीने उस्ताद रियाज अहमद खान यांना श्रध्दांजली सभेत ते बोलत होते . यावेळी बाळासाहेब शिवरकर यांनी रियाझ वस्ताद यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले कि , रियाझ वस्ताद यांनी आम्हाला त्यागाची शिकवण दिली . त्यांना अमीनुद्दीन पेनवाले यांच्या जागी भवानी पेठ विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षातुन तिकीट मिळत होते परंतु आपण आपले राजकीय गुरुस्थानी असलेले अमीनुद्दीन पेनवाले यांच्या विरोधात आपण निवडणूक लढविणार नाही . तसेच , अली सोमजी यांना महापौर करण्यात यावे आपल्या पेक्षा अलीभाई महापौरपदाची कारकीर्द निभावतील . त्यावेळी रियाझ वस्ताद याना महापौर तसेच उपमहापौर करा असा काँग्रेस पक्षातून आग्रह होता परंतु त्यावेळी देखील रियाझ वस्ताद याना महापौर व उपमहापौर करा असा आग्रह असताना त्यांनी या पदांचा त्याग केला . तसेच मी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होतो व खासदार सुरेश कलमाडी खासदार असताना त्यावेळी संदीप लडकतच्या ऐवजी रशीद शेख यांना काँग्रेस पक्षाने तिकीट देण्याचा आग्रह त्यांनी लावून धरला . अखेरीस रियाझ वस्तादांनी रशीद शेख यांना तिकीट मिळावे असा आग्रह लावून धरल्यामुळे संदीप लडकतचे तिकीट कापून रशीद शेख याना तिकीट द्यावे लागले . श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास जागा मिळवून देण्याकरिता रियाझ वस्तादांचा वाटा असल्याचे सांगितले . रियाझ वस्ताद हे महापालिकेत स्थायी समिती सदस्य असताना त्यांनी सभागृहात सार्वजनिक पाण्याचा हौद व अग्निशमन दलाची जागा हि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास देण्यात यावी असा ठराव मांडला आणि त्या ठरावास तत्कालीन नगरसेवक उल्हास काळोखे यांनी अनुमोदन दिले . अशा पद्धतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास जागा मिळवून देण्यास रियाझ वस्तादांचा महत्वाचा वाटा आहे . रियाझ वस्ताद हे भारतीय नौदलात असताना भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी पाकिस्तानची पाणबुडीवर हल्ला चढवून ती बुडविली . भारत बांगलादेश देश युध्दात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली . इंदिरा गांधी यांना अटक झाली असताना रियाझ वस्ताद यांनी स्वतःला अटक करून घेतली . वस्ताद हे सेक्युलर विचाराचे होते . अडचणीच्या काळात ते काँग्रेस पक्षाबरोबर प्रामाणिक व निष्ठावंत राहिले . त्यांच्या निधनाच्या दिवशी ते कोंढवा येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात उपस्थित होते .
या श्रध्दांजली सभेस सीरत कमिटीचे सचिव रफीउद्दीन शेख ,उस्मान हिरोली , अमीन शेख , अतिक शेख , सलीम शेख , हाजी पठाण विजय जाधव , वीरेंद्र किराड , इसाक जाफर , ऍड. अय्युब शेख , मौलाना निजामुद्दीन , नगरसेवक गफूर पठाण , अभय छाजेड , भारत कांबळे , हसन कुरेशी , इकबाल शेख , अजीज खान , मुश्ताक अलबुशरा , सुलतान खान , राजू शेख , प्रविण जाधव , गुलाम दस्तगीर , करीम अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीरत कमिटीचे सचिव रफीउद्दीन शेख यांनी केले .